शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

संपूर्ण लॉकडाउनमुळं कोरोना व्हायरस खेड्यापाड्यात पोहोचेल; राहुल गांधींचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 1:56 PM

दरम्यान सरकारने परराज्यातील कामगारांसाठी पॅकेजची केलेली घोषणा कौतुकास्पद आहे. मात्र ही मदत तत्काळ जनतेपर्यंत पोहोचायला हवी, अस राहुल यांनी सांगितले. तसेच जाहीर केलेल्या पॅकेजचे वेळापत्रक जाहीर करण्याची विनंती राहुल यांनी केली आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यावर उपाययोजना म्हणून अर्थमंत्र्यांनी हातावरचे पोट असलेल्या ८० कोटी गरिबांना १.७ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यावर राहुल गांधी यांनी स्तुतीसुमने उधळी होती. सरकार योग्य मार्गावर असल्याचे म्हटले होते. आता लॉकडाउनमुळे निर्माण होणाऱ्या संकटाकडे राहुल गांधी यांनी मोदी सरकरचे लक्ष वेधले आहे.

राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लॉकडाउनचा निर्णय धोकादायक ठरू शकतो, असं म्हटले आहे. देशातील वयस्कर लोक मोठ्या प्रमाणात खेड्यात राहतात. संपूर्ण लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेची चाक थांबली आहे. परिणामी शहरात काम करणारे युवक आणि कामगार पुन्हा खेड्याकडे परत निघाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. खेड्याकडे निघालेल्या युवकांचे आई-वडील, आजोबा-आजी खेड्यात राहतात. शहरातून निघालेले युवक न कळतपणे कोरोना व्हायरस गावाकडे घेऊन जाण्याची शक्यता आहे. यातून खेड्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाउनला पर्याय काढावा, असा सल्ला राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे.

दरम्यान सरकारने परराज्यातील कामगारांसाठी पॅकेजची केलेली घोषणा कौतुकास्पद आहे. मात्र ही मदत तत्काळ जनतेपर्यंत पोहोचायला हवी, अस राहुल यांनी सांगितले. तसेच जाहीर केलेल्या पॅकेजचे वेळापत्रक जाहीर करण्याची विनंती राहुल यांनी केली आहे.

देशात लॉकडाउनची घोषणा केल्यापासून विविध राज्यातील कामगार स्थलांतर करत आहेत. रेल्वे आणि परिवहन यंत्रणा बंद असल्यामुळे अनेकजन पायी आपापल्या गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली असून सरकारला सूचक इशारा दिला आहे.