शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी मिळण्यासाठी कायदा करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 20:24 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी कामावर जाणा-या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी या मागणीला पाठिंबा दिला आहे

हैदराबाद, दि. 16 - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी कामावर जाणा-या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी या मागणीला पाठिंबा दिला आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी मिळावी यासाठी कायदेशीर तरतूद केली गेली पाहिजे असं मत वृंदा करात यांनी व्यक्त केलं आहे. 'महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी घेण्याची सुविधा देण्यात आली पाहिजे. सुट्टी हवी आहे की नाही यासाठीही तिच्याकडे पर्याय उपलब्ध असला पाहिजे. यासाठी कायद्यात तरतूद करायला काही हरकत नाही', असं वृंदा करात बोलल्या आहेत. 

आणखी वाचाचर्चा मासिक पाळीच्या सुट्टीचीया देशात मासिक पाळी आली की महिलेला काढतात घराबाहेरवृंदा करात यांनी या विषयावर पुढे बोलताना सांगितलं आहे की, 'मासिक पाळीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. अशा परिस्थितीत सुट्टीची गरज आहे की नाही हा पर्याय महिलांकडे असला पाहिजे'. कामासाठी घराबाहेर पडणा-या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी दिली पाहिजे अशी मागणी गेल्या काही दिवसांसून होत आहे. मुंबईतील "कल्चर मशिन" नावाच्या एका खासगी कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर केल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता. 

केरळ सरकारनेही गेल्याच आठवड्यात महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी यासाठी नियम आखत असल्याचं सांगितलं होतं. वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतरच नियम आणला जाईल असंही राज्य सरकारने सांगितलं होतं. 

मासिक पाळीबद्दल थोडक्यात माहिती - मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी थोडी अगोदरही सुरु होऊ शकते. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यामुळे महिलेला आई बनता येते. पण हेच चक्र बिघडले तर? पाळी मागे-पुढे झाली तर अनेकांना काळजी वाटते. पाळी उशिरा येण्यामागेही काही महत्वाची कारणे असतात. यामध्ये लठ्ठपणा, तणाव, वजन कमी होणे, प्रजनन नियंत्रण, थायरॉईड, गर्भधारणा या कारणांमुळे पाळी उशिरा येऊ शकते हे लक्षात घेतलं पाहिजे. "कल्चर मशिन" नावाच्या कंपनीने केली सुट्टी जाहीरमुंबईतील "कल्चर मशिन" नावाच्या एका खासगी कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर केली आहे. डिजिटल कंपनी असणा-या  "कल्चर मशिन"मध्ये एकूण 75 महिला काम करतात. आपल्या महिला कर्मचा-यांसाठी कंपनीने हा निर्णय घेत पहिल्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी भरपगारी असणार आहे, त्यामुळे सुट्टी घेतल्यामुळे एक दिवसाचा पगार जाण्याची भीती नसणार आहे.  आपल्या हा निर्णय जाहीर करण्याआधी कंपनीने महिला कर्मचा-यांना मासिक पाळीसंबंधी त्यांची मतं विचारली. सोबतच पहिल्या दिवशी सुट्टी किती गरजेची असते यासंबंधी प्रश्न विचारले. यासंबंधी व्हिडीओही शूट करण्यात आला. याचवेळी कंपनीने महिलांना आपण हा निर्णय लागू केल्याची माहिती दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या महिला कर्मचा-यांनी सर्व कंपन्यांनी हा निर्णय घ्यावा असं आवाहनही केलं होतं.