शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणासह निवडणुका! सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 05:33 IST

न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाने जयंतकुमार बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला असून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने बुधवारी राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. 

निवडणुका व्हाव्यात, अशी आमची इच्छा असून आम्ही स्पष्ट सांगतो की, निवडणूक प्रक्रिया सुरू होऊ द्या. याला तार्किक शेवटापर्यंत जाऊ द्या, असे न्या. ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली न्यायपीठाने म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी संबंधित याचिकांवर सुनावणी करणाऱ्या न्यायपीठात न्या. एस. एस. ओक आणि न्या. जे. बी. पारदीवाला यांचाही समावेश आहे.

न्यायालयाने नमूद केले की, राज्य निवडणूक आयोगाने निदर्शनास आणून दिले की, ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आधीच सुरू झालेला आहे. ही प्रक्रिया तार्किक शेवटापर्यंत नेली जाईल. स्थितिदर्शक अहवालातील उल्लेखित उर्वरित स्वराज्य संस्थांबाबत आम्ही आयोग व राज्य सरकारला निर्देश देतो की, या प्रत्येक संस्थांसाठी निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करावी. ही प्रक्रिया ४ मे २०२२ रोजीच्या न्यायालयाच्या निर्देशाच्या आधारे पुढे न्यावी.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची प्रक्रिया दाेन आठवड्यात सुरू करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने सांगितले असले तरी, ऑगस्टनंतरच निवडणूका हाेतील, अशी शक्यता आहे. पावसळ्यानंतर निवडणुका घेण्याची विनंती राज्य सरकारने राज्य निवडणूक आयाेगाला आधीच केली आहे.

बेमुदत स्थगिती देणे अशक्यच

- राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही निवडणूक प्रक्रियेबाबतचा स्थितिदर्शक अहवाल व अनुपालन अहवाल सादर केला आहे. 

- हस्तक्षेप याचिककर्त्याच्या वकिलाने परिसीमनसंबंधित मुद्दा उपस्थित केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की, निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी आमची इच्छा आहे, बस एवढेच. हस्तक्षेप याचिकेतील विनंतीचा परिणाम निवडणूक खोळंबिणे आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. 

- जर, तर असे तर्क थांबवावेत, असेही न्यायालय तोंडी म्हणाले. कधी परिसीमनाची, तर कधी पावसाळ्याची सबब दिली जाते. हा प्रकार चालूच आहे आणि चालू राहील. हे नेहमीसाठी चालू शकत नाही. निवडणुका बेमुदत स्थगित केल्या जाऊ शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय