शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

निवडणुकीत भाजपचे २८, तर काँग्रेसचे ३0 मित्रपक्ष, मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 3:12 AM

हरिश गुप्ता नवी दिल्ली : आधीच्या काही मित्रपक्षांकडून हात पोळले गेल्याने भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या लोकसभा ...

हरिश गुप्तानवी दिल्ली : आधीच्या काही मित्रपक्षांकडून हात पोळले गेल्याने भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या लोकसभा निवडणुकांसाठी नवे मित्रपक्ष शोधले आहेत. मतविभागणी टाळण्यासाठीच दोन्ही पक्षांनी यंदा जोर लावला आहेत. भाजपने राजस्थान लोकतांत्रिक पार्टीचे हनुमान बेनीवाल यांना जवळ करून लगेच उमेदवारी दिली आणि गुज्जर समाजाचे नेते किरोडीलाल बैंसला यांनाही आपल्या रालोआचा घटक बनवून त्यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांत झालेल्या पराभवामुळे भाजपने तिथे सारी ताकद लावायला सुरुवात केली आहे.

भाजपने यंदा ५४३ पैकी तब्बल १0५ जागा आपल्या मित्रपक्षांना सोडल्या असून, स्वत:चे उमेदवार ४३८ ठिकाणी रिंगणात उतरवले आहेत. तामिळनाडूमध्ये शिरकाव करण्यासाठी भाजपने अण्णा द्रमुकला आपलेसे केले. आधी भाजपचा तामिळनाडूमध्ये एकच खासदार होता. तिथे स्वत:च्या ताकदीवर लढण्याचा मानस भाजपने सोडला, याचे कारण तिथे द्रमुकसारख्या प्रबळ पक्षाशी सामना करायचा होता. केरळमध्ये भाजप तिसरा महत्त्वाचा पक्ष बनू पाहत आहे. तिथेही भाजपचा एकच खासदार असून, यंदा तिरुअनंतरपुरमची जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

भाजपचे २0१४ साली ४२ मित्रपक्ष होते. पण यंदा १९ मोठे व ९ किरकोळ असे २८ मित्रपक्षच भाजपसमवेत आहेत. त्यापैकी काहींचे उमेदवार रिंगणातच नाहीत. ते पक्ष केवळ भाजपला पाठिंबा देत आहेत. त्यात महाराष्ट्रातील रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उल्लेख करावा लागेल. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात शिवसेना, बिहारमध्ये संयुक्त जनता दल, उत्तर प्रदेशात अपना दल यांच्याशी भाजपला फारच जुळवून घ्यावे लागले. एवढेच नव्हेतर, आपल्या मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी आर्थिक व अन्य मदत देण्याचे काम भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले.

१६ मित्रपक्ष वाढवले काँग्रेसने याउलट काँग्रेसकडे २0१४ साली १४ मित्रपक्षच होते. त्यामुळे यंदा नवे मित्र शोधण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले आणि आता त्याकडे ३0 मित्रपक्ष आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट व भारतीय कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये काँग्रेसचे प्रतिस्पर्धी असले तरी ओडिशामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे पक्ष काँग्रेससोबत आहेत. पश्चिम बंगालमधील दोन मतदारसंघांत, जिथे माकपचे उमेदवार आहेत तिथे काँग्रेसने आपले उमेदवार यावेळी उभे केलेले नाहीत. नॅशनल कॉन्फरन्सला आपल्यासोबत घेण्यात काँग्रेसला यंदा यश आले आहे. महाराष्ट्रातही महाआघाडी करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस