शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

Eknath Shinde Help to Flood Victims: आसाममधील पूरग्रस्तांसाठी 'शिंदे गटाचा' पुढाकार; 51 लाखांची मदत करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:49 IST

Eknath Shinde And Assam Flood : आसामला पावसाचा तडाखा बसला आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'शिंदे गटाने' पुढाकार घेतला आहे. 

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचं आवाहन केल्यानंतरही शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. या संपूर्ण राजकीय पेचात आता राज्यपाल केंद्रस्थानी आले असून त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. तसंच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आज मुंबईत परतणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे आसामला पावसाचा तडाखा बसला आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आसाममधील पूरग्रस्तांच्या (Assam Flood) मदतीसाठी 'शिंदे गटाने' पुढाकार घेतला आहे. 

एकनाथ शिंदे गटाकडून आसाममधील पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आसाममध्ये पुराचे थैमान पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं असून लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भबानीपूर भागातील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी बजली येथील चारलपारा नयापारा येथील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. पुरामुळे आसाममधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाखो लोकांना पुराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे आसाम सरकार पूरग्रस्तांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. आसाममध्ये पुरामुळे जवळपास 134 लोकांचा मृत्यू झाला आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री पाण्यात उतरले आहेत. 

आसामला पुराचा तडाखा! लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उतरले पाण्यात; 134 जणांचा मृत्यू

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पुरामुळे 8 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, राज्यात 21 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. राज्यातील विविध पूरग्रस्त भागात मदत साहित्य पाठवण्यात येत आहे. नागाव जिल्ह्याचे जिल्हा उपायुक्त निसर्ग हिवरे यांनी सांगितले की, राज्य सरकार बाधित भागात मदत साहित्य पुरवत आहोत. मदतकार्य सुरू आहे. आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मते, राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 21.52 लाख लोकांना याचा फटका बसला आहे, आदल्या दिवशी 28 जिल्ह्यांमध्ये 22.21 लाख होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतांश नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. मात्र नागावमधील कोपिली, कछारमधील बराक आणि करीमगंजमधील करीमगंज आणि कुशियारा धोक्याची पातळी ओलांडून  वाहत आहेत.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAssam Floodआसाम पूरAssamआसाम