शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एक अकेला... सर्वपक्षीय विरोधकांच्या बैठकीनंतर भाजपकडून सिंहाचा व्हिडिओ शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 19:23 IST

आगामी काळात विरोधक एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आणखी एक बैठक होणार आहे.

पाटणा - देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची आज पाटना येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मोदी सरकारला आणि भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुट केली असून आपापसातील मतभेद बाजुला ठेऊन सर्वांनी एकत्र येण्याचा विचार मांडला. देशातील ११ विरोधी पक्षांनी या बैठकीला हजेरी लावत आपलं समर्थन दिलं. या बैठकीनंतर आता भाजपाकडून पलटवार करण्यात येत आहे. भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीवर भाष्य करताना, ही मोदी हटाओ बैठक नसून परिवार बचाओ बैठक असल्याचा टोला त्यांनी लगावला होता. तर, भाजपने एक व्हिडिओ शेअर करत या बैठकीवर टीका केली आहे.

आगामी काळात विरोधक एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आणखी एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीला अंतिम रूप येईल. विरोधकांमध्ये मतभेद नाहीत. देशहितासाठी सगळे एकत्र येत आहेत. आजच्या बैठकीत चर्चा झाली. पुढील आव्हानांना एकत्र सामोरे जाणार असल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. तसेच, या बैठकीमुळे देशात बदल घडवण्याची सुरुवात पाटणातून झाल्याचंही ते म्हणाले. या बैठकीवर भाजपने टीका केली आहे. 

भाजपच्या महाराष्ट्र ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये मोदींचा आवाज असून एक अकेला कितनों को भारी... असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असल्याचं ऐकू येतंय. याशिवाय व्हिडिओत एका सिंहावर अनेक कोल्हे हल्ला करत असून तो सिंह सर्वांना परतवून लावत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. भेड के हाहाकार के बदले शेर कि एक दहाड है!, असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलंय.

काय म्हणाले शरद पवार

शरद पवार यांनी बैठकीनंतर बोलताना जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाची आठवण सांगितली. जयप्रकाश यांनी एक संदेश दिला आणि देशात संपूर्ण वातावरण बदललं होतं, असे पवार यांनी म्हटलं. बिहारमधून अनेक आंदोलनांची सुरुवात झाली आणि ते जनतेनं स्विकारले. आज नितीश कुमार यांनी येथे बैठका बोलावली, त्यासाठी सर्वपक्षीय सहकारी एकत्र आले. या बैठकीत चर्चा झाली, त्यातून सर्वांनीच एकत्र येऊन काम करण्याचं निश्चित केलं आहे. एक नवीन रस्ता दाखवण्याचं काम इथून सुरू झालं आहे. मला विश्वास आहे की देशातील जनता याचं समर्थन करेल, असे शरद पवार यांनी म्हटले.

विरोधकांच्या बैठकीवर फडणवीसांची टीका

देशात सध्या मोदी विरूद्ध विरोधक असा संघर्ष हळूहळू अधिक तीव्र होत आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी अमेरिकेत आहेत तर दुसरीकडे आज बिहारच्या पाटण्यामध्ये सुमारे १५ विरोधी पक्षांनी एकत्रित मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुखे उद्धव ठाकरे यांनीही सहभाग नोंदवला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारला हटवण्यासाठी आम्ही सारे लोक एकत्र आलो आहोत, असा सूर विरोधकांनी बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना आळवला. पण अशा मेळाव्यांचा काहीही फायदा होणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरच्या फळीतील नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सध्या सुरू असलेला हा मेळावा म्हणजे मोदी हटाव मेळावा नसून परिवार बचाव मेळावा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, उद्धव ठाकरे आणि मेहबुबा मुफ्ती एकाच मंचावर आल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाBiharबिहार