शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

भूकंपाने हिमालय हादरला

By admin | Updated: April 26, 2015 02:32 IST

नेपाळमध्ये शनिवारी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी सुमारे ५,००० नागरिक मृत्युमुखी पडले. या भूकंपाचे धक्के हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळला लागून असलेल्या भारताच्या राज्यांनाही बसले.

दिल्ल्लीने पाठविली तातडीने मदत : राज्यातील पर्यटक सुखरूपनेपाळमध्ये शनिवारी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी सुमारे ५,००० नागरिक मृत्युमुखी पडले. या भूकंपाचे धक्के हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळला लागून असलेल्या भारताच्या राज्यांनाही बसले. त्यात बिहारमध्ये ३८, उत्तर प्रदेशात ११ तर पश्चिम बंगालमध्ये दोन जण दगावले़ यात २३७ जण जखमी होऊन शेकडो घरांची पडझड झाली. या भूकंपाने एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखरावर प्रचंड प्रमाणावर हिमस्खलन होऊन एव्हरेस्ट चढाईच्या तयारीत असलेले बेस कॅम्पवरील विविध देशांतील १८ गिर्यारोहकही ठार झाले. हिमालयाच्या पलीकडे असलेल्या तिबेटमध्येही या भूकंपाने पाच बळी घेतले.रिश्टर स्केलवर ७.९ एवढी तीव्रता नोंदली गेलेल्या पहिल्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू काठमांडूच्या पश्चिमेस गोरखा जिल्ह्यात भूपृष्ठाच्या खाली १५ किमीवर होता. नेपाळमध्ये गेल्या ८० वर्षांत झालेला हा सर्वात भीषण भूकंप होता. त्यानंतर ४० मिनिटांनी गोरखा व रसुवा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे ६.६ व ५.८ रिश्टरचे धक्के बसले. त्यापुढील अडीच तासांत किमान ५ रिश्टरचे आणखी १० भूकंपाचे धक्के जाणवले. काठमांडू ही राजधानी आणि तिला लागून असलेल्या ललितपूर व भक्तपूर या जोडशहरांसह इतर शहरांमध्ये हजारो इमारतींची पडझड झाली. रात्री काळोख पडेपर्यंत ढिगाऱ्यांखालून हजारो मृतदेह बाहेर काढले होते. मृतांचा आकडा आणखी बराच वाढेल, अशी भीती सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. नेपाळच्या एकूण ७५ पैकी २९ जिल्ह्यांमध्ये भूकंपाने हानी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. काठमांडू शहरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला शंभर वर्षांहून जूना धरहरा टॉवर व दरबार चौकातील जुन्या राजेशाही वास्तू पूर्णपणे उद््ध्वस्त झाल्या. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पशुपतीनाथ मंहिराचीही थोडीफार पडझड झाली. पुरातन स्वयंभूनाथ स्तूप मात्र या विनाशातून सुदैवाने बचावला. नेपाळमधील या विनाशकारी नैसर्गिक आपत्तीनंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन भारताकडून नेपाळला शक्य ती सर्व मदत तातडीने देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दहा तुकड्या नेपाळकडे व पाच तुकड्या उत्तर प्रदेश व बिहारकडे लगेच रवाना झाल्या. भारतीय वायुदलाने भूकंपग्रस्त काठमांडूत अडकलेल्या ५५ भारतीयांना सुखरुप भारतात आणले. यात चार लहान बालकांचा समावेश आहे. सी-१३० जे हे विमान तातडीने एनडीआरएफचे एक पथक आणि मदत साहित्य घेऊन काठमांडूत दाखल झाले होते. हे विमान शनिवारी रात्री १०.४५ वाजता दिल्लीत ५५ भारतीयांना घेऊन पोहोचले. पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नेपाळच्या नेत्यांशी संपर्क ठेवून हरतऱ्हेच्या मदतीची त्यांना ग्वाही दिली. जीवितहानी झालेल्या बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही युद्ध पातळीवर बचाव व मदत कार्य हाती घेण्यात आले. केंद्र सरकारने या राज्यांनाही हरतऱ्हेची मदत देऊ केली असून आपत्ती निवारण दलाखेरीज लष्करी तुकड्याही तेथे रवाना झाल्या. प्राणहानी वा पडझड झाली नसली तरी या भूकंपाचे धक्के दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, सिक्किम व महाराष्ट्र या दूरवरच्या राज्यांमध्येही जाणवले. अनेक ठिकाणी लोक घाबरून घरांतून बाहेर पडून रस्त्यांवर आले. (लोकमत न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था)काठमांडू येथील भारतीय दूतावासाच्या आवारातील इमारत कोसळून मदन नावाच्या कर्मचाऱ्याची मुलगी ठार झाली; तर पत्नी गंभीर जखमी असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी टिष्ट्वटरवर दिली.