शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कोर्टाच्या इतिहासात प्रथमच वडिलांनंतर मुलगाही सरन्यायाधीश! महाराष्ट्रासाठी मोठ्या अभिमानाचा क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 09:16 IST

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे वडील वाय. व्ही. चंद्रचूड हेदेखील ४४ वर्षांपूर्वी सरन्यायाधीश होते.

नवी दिल्ली :

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे वडील वाय. व्ही. चंद्रचूड हेदेखील ४४ वर्षांपूर्वी सरन्यायाधीश होते. ते सर्वाधिक काळ देशाचे सरन्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात माजी सरन्यायाधीशांचा मुलगा या पदावर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बाब ठरली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची सूची समृद्ध करणारे न्यायाधीश म्हणून गणले जाणारे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्याकडे तीक्ष्ण, स्पष्ट आणि दूरदर्शी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते. चंद्रचूड यांना त्यांच्या वर्तुळात ‘डीवायसी’ म्हणून संबोधले जाते.  

वडिलांचा निर्णय फिरवला न्यायमूर्ती  चंद्रचूड यांनी २०१८ मध्ये विवाहबाह्य संबंध रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. १९८५ मध्ये, तत्कालीन सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने एका प्रकरणात कलम ४९७ कायम ठेवले होते. त्यात संंबंध बनविण्यासाठी एक पुरुषच जबाबदार असतो स्त्री नाही, असे गृहीत धरण्यात आले होते. डी. वाय. चंद्रचूड यांनी २०१८ च्या निकालात हा निर्णय रद्द केला. 

- सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली.- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. धनंजय वाय. चंद्रचूड यांना भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शपथ दिली.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना आदरपूर्वक शुभेच्छा. आणखी एक महाराष्ट्राचा सुपुत्र भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहे, हे निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. धनंजय चंद्रचूड आपल्या कारकिर्दीत भारताच्या न्यायिक क्षेत्रातील गौरवात आपल्या कामगिरीने भर घालतील, असा विश्वास आहे.     - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सावंतवाडीशी जवळचे नाते...चंद्रचूड कुटुंबाचे सावंतवाडीशी जवळचे नाते असून, वडील यशवंत चंद्रचूड यांचे शिक्षण सावंतवाडीत झाले, तर आजोबा राजघराण्याचे दिवाण म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. चंद्रचूड घराण्याची नाळ पूर्वीपासून सावंतवाडीशी जोडली गेलेली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सावंतवाडी संस्थानात दिवाण होते. तीन पिढ्या ते सावंतवाडी संस्थानशी नाळ ठेवून होते, असे सांगण्यात आले.

‘डीवायसीं’ची कारकीर्द - ११ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेले आणि हार्वर्डला जाण्यापूर्वी सेंट स्टिफन कॉलेज आणि कॅम्पस लॉ सेंटरमध्ये शिकलेले डी. वाय. चंद्रचूड दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी मानले जातात. - त्यांची १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती. - याआधी ते मुंबई न्यायालय तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. - त्यांनी १९९८ मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात वकिली केलेली आहे. - तसेच अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठात अध्यापनही केलेले आहे.

राज्यात पहिले येण्याची हॅट् ट्रिकहीचंद्रचूड परिवाराचा पुणे शहराशी जवळचा ऋणानुबंध राहिला आहे. त्यांचे मूळ गाव कणेरसर (ता. खेड) येथील वाडा तर अजूनही अस्तित्व ठेवून आहे. कणेरसर येथील वाड्यात चंद्रचूड यांचे नातेवाईक आजही राहतात. गावातील काहीजणांनी सांगितले की, यशवंतरावांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सन १९१२ मध्ये त्यावेळच्या एलएल.बी.च्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आले होते. त्यांच्यानंतर यशवंतराव सन १९४२ मध्ये व नंतर त्यांची मुलगी १९७१ मध्ये याच परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आली होती. पिता-पुत्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याबरोबरच राज्यात एलएल.बी. परीक्षेत सर्वप्रथम येण्याची हॅट्ट्रिकही चंद्रचूड परिवाराच्या नावावर असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

महत्त्वाचे निर्णय...- अयोध्या जमीन वाद, कलम ३७७, गोपनीयतेचा अधिकार, शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश, गर्भधारणेबाबच्या कायद्याची व्याप्ती यासह अनेक महत्वाच्या निर्णयांंमध्ये त्यांचा सहभाग होता.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड