शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

"दुर्योधन, दु:शासन दुष्ट होते, पण त्यांनी आणीबाणी लादली नाही"; थरूर यांच्या पुस्तकाचा आधार घेत ठाकूर यांची फटकेबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 20:37 IST

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देत अनुराग ठाकूर म्हणाले, “रीलचे नेते बनू नका, खूप व्हायरल होते. रियल नेते बना, त्यासाठी सत्य बोलावे लागते. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि त्यांचे महाभारताचे ज्ञानही अपघाती आहे. राहुल गांधी यांनी कधी महाभारत वाचले तर सोडाच, पण पाहिलेही नसेल."

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहात जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेत आज भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार अनुराग ठाकूर यांनीही भाग घेताल. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या महाभारतावरील वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी केली. यावेळी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला.

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देत अनुराग ठाकूर म्हणाले, “रीलचे नेते बनू नका, खूप व्हायरल होते. रियल नेते बना, त्यासाठी सत्य बोलावे लागते. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि त्यांचे महाभारताचे ज्ञानही अपघाती आहे. राहुल गांधी यांनी कधी महाभारत वाचले तर सोडाच, पण पाहिलेही नसेल. कदाचित त्यांचे भाषण अंकल सॅम अथवा अंकल सोरोस यांनी लिहून दिलेले असावे.”

शशी थरूर यांच्या पुस्तकाचा उल्लेख -भाजप खासदार म्हणाले, “मी महाभारतावरील एक नवीन पुस्तक वाचले. ते पुस्तक त्यांच्याच पक्षाचे खासदार (शशी थरूर) यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे 'द ग्रेट इंडियन नोबेल'. राहुल गांधी यांना महाभारत आणि चक्रव्यूहची संपूर्ण माहिती हवी असेल, तर ते त्यांच्याशी संपर्क सादू शकतात. या कादंबरीत कोणत्या नेत्याला धृतराष्ट्र म्हटले आहे? कोणत्या पक्षाला कौरव म्हटले आहे? आणि कोण दुर्योधन आहे? हे राहुल गांधींना समजल्यानंतर त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते. हे लोक केवळ पुस्तके दाखवतात. पण वाचत नाहीत. ते संविधान हलवत होते, मी विचारलं किती पानं आहेत, तेही सांगता आले नाही.”

ते पुढे म्हणाले, “या पुस्तकानुसार, ज्या पक्षाचे सर्वेसर्वा आपण आहात, त्याच पक्षाला कौरव म्हणण्यात आले आहे. मी पान क्रमांक 245 कोट करतो. यात देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना धृतराष्ट्र म्हणण्यात आले आहे. यात पुढे आणीबाणीचीही चर्चा आहे. 

"दुर्योधन, दु:शासन दुष्ट असू शकतात पण इमरजेन्सी नाही लावली" -अनुराग ठाकूर यांनी आणीबाणीचा उल्लेख करत इंदिरा गांधी यांचे नाव घेतले. ते म्हणाले, “मी ज्यांच्या बद्दल बोलत आहे, त्या देसाच्या पंतप्रधान होत्या आणि एका नेत्याच्या आजी होत्या. अनुराग पुढे म्हणाले, दुर्योधन, दु:शासन दुष्ट असू शकतात पण त्यांनीही कधी आणीबाणी लावली नव्हती.”    

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndira Gandhiइंदिरा गांधी