शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

"दुर्योधन, दु:शासन दुष्ट होते, पण त्यांनी आणीबाणी लादली नाही"; थरूर यांच्या पुस्तकाचा आधार घेत ठाकूर यांची फटकेबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 20:37 IST

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देत अनुराग ठाकूर म्हणाले, “रीलचे नेते बनू नका, खूप व्हायरल होते. रियल नेते बना, त्यासाठी सत्य बोलावे लागते. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि त्यांचे महाभारताचे ज्ञानही अपघाती आहे. राहुल गांधी यांनी कधी महाभारत वाचले तर सोडाच, पण पाहिलेही नसेल."

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहात जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेत आज भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार अनुराग ठाकूर यांनीही भाग घेताल. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या महाभारतावरील वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी केली. यावेळी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला.

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देत अनुराग ठाकूर म्हणाले, “रीलचे नेते बनू नका, खूप व्हायरल होते. रियल नेते बना, त्यासाठी सत्य बोलावे लागते. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि त्यांचे महाभारताचे ज्ञानही अपघाती आहे. राहुल गांधी यांनी कधी महाभारत वाचले तर सोडाच, पण पाहिलेही नसेल. कदाचित त्यांचे भाषण अंकल सॅम अथवा अंकल सोरोस यांनी लिहून दिलेले असावे.”

शशी थरूर यांच्या पुस्तकाचा उल्लेख -भाजप खासदार म्हणाले, “मी महाभारतावरील एक नवीन पुस्तक वाचले. ते पुस्तक त्यांच्याच पक्षाचे खासदार (शशी थरूर) यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे 'द ग्रेट इंडियन नोबेल'. राहुल गांधी यांना महाभारत आणि चक्रव्यूहची संपूर्ण माहिती हवी असेल, तर ते त्यांच्याशी संपर्क सादू शकतात. या कादंबरीत कोणत्या नेत्याला धृतराष्ट्र म्हटले आहे? कोणत्या पक्षाला कौरव म्हटले आहे? आणि कोण दुर्योधन आहे? हे राहुल गांधींना समजल्यानंतर त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते. हे लोक केवळ पुस्तके दाखवतात. पण वाचत नाहीत. ते संविधान हलवत होते, मी विचारलं किती पानं आहेत, तेही सांगता आले नाही.”

ते पुढे म्हणाले, “या पुस्तकानुसार, ज्या पक्षाचे सर्वेसर्वा आपण आहात, त्याच पक्षाला कौरव म्हणण्यात आले आहे. मी पान क्रमांक 245 कोट करतो. यात देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना धृतराष्ट्र म्हणण्यात आले आहे. यात पुढे आणीबाणीचीही चर्चा आहे. 

"दुर्योधन, दु:शासन दुष्ट असू शकतात पण इमरजेन्सी नाही लावली" -अनुराग ठाकूर यांनी आणीबाणीचा उल्लेख करत इंदिरा गांधी यांचे नाव घेतले. ते म्हणाले, “मी ज्यांच्या बद्दल बोलत आहे, त्या देसाच्या पंतप्रधान होत्या आणि एका नेत्याच्या आजी होत्या. अनुराग पुढे म्हणाले, दुर्योधन, दु:शासन दुष्ट असू शकतात पण त्यांनीही कधी आणीबाणी लावली नव्हती.”    

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndira Gandhiइंदिरा गांधी