शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

17 नोव्हेंबरपर्यंत संसदेची नवीन इमारत असलेल्या 'सेंट्रल विस्टा' प्रोजेक्टचे काम बंद, 'हे' आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 6:50 PM

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांनी दिल्लीतील सर्व प्रकारच्या बाधकामांवर बंदी घातली आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील सतत वाढत असलेल्या वायू प्रदूषणानंतरआप सरकारने राजधानीत सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घातली आहे. दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांना 'सेंट्रल व्हिस्टा' प्रकल्पाच्या बांधकामाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट केले की, सध्या सर्व बांधकामे बंद आहेत. ते म्हणाले की, दिल्लीच्या आत सुरू असलेली सर्व बांधकामे प्रदूषणामुळे बंद करण्यात आली आहेत. मग ती छोटी-मोठी बांधकामे असो किंवा केंद्राची, दिल्ली सरकारची असो, सर्व प्रकारची बांधकामे काहीकाळ बंद राहतील.

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय पुढे म्हणाले की, राजधानीत खाजगी आणि एमसीडी कामासह सर्व प्रकारची बांधकामे सध्या बंद आहेत. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे सरकारने सर्व शाळा आणि प्रशिक्षण केंद्रेही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी आधीच परीक्षा आहेत त्यांनाच सूट दिली जाईल. बांधकाम साईट्सवरील काम येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल, अशी माहिती त्यांनी दिली.

सेंट्रल व्हिस्टाचे काम 17 नोव्हेंबरपर्यंत होणार नाही

संसदेच्या नवीन इमारतीचे काम जोरात सुरू आहे. पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवीन संसद भवन जुन्या संसद भवनापेक्षा 17 हजार चौरस मीटर मोठे असेल. एकूण 64500 चौरस मीटर क्षेत्रात 971 कोटी रुपये खर्चून संसदेची नवीन इमारत बांधली जात आहे. ते बांधण्याचे कंत्राट टाटा प्रोजेक्ट लिमिटेडकडे आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे सध्या दिल्ली सरकारने सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घातली आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत केंद्र किंवा दिल्ली सरकारसह कोणतेही खाजगी बांधकाम करता येणार नाही. अशा स्थितीत संसद भवनाचे बांधकामही ठप्प झाले आहे.

दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे परिस्थिती बिकट

प्रदूषणामुळे सर्व बांधकामांवर बंदी घालण्यात आल्याचे दिल्लीच्या पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आता ते काम केंद्राचे असो वा दिल्ली सरकारचे, ते 17 नोव्हेंबरपर्यंत होऊ शकणार नाही. त्यानंतर परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल. राजधानी दिल्ली सध्या गॅस चेंबरमध्ये बदलली आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, लोकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. हीच परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाने सरकारला लॉकडाऊन लागू करण्याची सूचनाही केली आहे. दिल्ली सरकारने सध्या लॉकडाऊन लागू केला नसला तरी आठवडाभर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्लीAAPआपpollutionप्रदूषण