शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दिल्लीत आगीमध्ये होरपळून 17 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी काहींनी इमारतीच्या गच्चीवरुन उडया मारल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 22:41 IST

उत्तर दिल्लीतील बवाना इंडस्ट्रीयल भागातील एका तीन मजली प्लास्टिक कारखान्याला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली.  या आगीमध्ये होरपळून आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - उत्तर दिल्लीतील बवाना इंडस्ट्रीयल भागातील एका तीन मजली प्लास्टिक कारखान्याला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली.  या आगीमध्ये होरपळून आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही जण इमारतीत अडकले असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाडया आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. 

आगीवर आता नियंत्रण मिळवल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वप्रथम इमारतीच्या तळ मजल्यावर आग भडकली. नेमकी कशामुळे ही आग लागली ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण प्लास्टिकमुळे ही आग वेगाने पसरली. आग लागली त्यावेळी कारखान्यात कामगार काम करत होते. आग वेगाने पसरल्यामुळे अनेक महिलांना बाहेर पडता आले नाही. खालचे मजले आगीच्या ज्वाळांनी वेढल्यामुळे काही कामागारांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवरुन उडल्या मारल्या. त्यात काही जण जखमी झाले आहेत. 

 

संध्याकाळी 6.20 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच 10 गाडया घटनास्थळी पाठवल्या असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करुन आगीच्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. दिल्ली सरकार बचाव मोहिमेवर लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने या दुर्घटने प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत असे दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. मुंबईमध्येही अलीकडच्या काही दिवसात आगी लागण्याच्या मोठया घटना घडल्या असून त्यात अनेकांचा मृत्यू झाला.                                                                                                                                                                     

 

टॅग्स :fireआग