दुष्काळग्रस्त १९०५९ गावांना वीजसवलत ८६६ कोटींची !
By Admin | Updated: March 20, 2015 22:39 IST2015-03-20T22:39:59+5:302015-03-20T22:39:59+5:30
नारायण जाधव

दुष्काळग्रस्त १९०५९ गावांना वीजसवलत ८६६ कोटींची !
न रायण जाधवठाणे : राज्यातील टंचाई आणि दुष्काळग्रस्त सुमारे १९०५९ गावांतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने तेथील शेतकरी, वाणिज्यिक, औद्योगिक आणि कृषिपंपधारकांना वीजसवलत देण्याचा निर्णय घेतला होता़ या सवलतीपोटी महावितरणने केलेल्या मागणीनुसार ऊर्जा खात्याने त्यांना ८६६ कोटी रुपये रोखीने वितरीत करण्यास बुधवारी मान्यता दिली आहे़ यानुसार, ही रक्कम महावितरणला अदा करण्यासाठी उद्योग व ऊर्जा खात्याने आपले अवर सचिव वि़म़ राजूरकर आणि उपसचिव ब़शे़ मांडवे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे़दुष्काळ आणि टंचाईग्रस्त भागांसाठी महसूल विभागाच्या २५ नोव्हेंबर रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील टंचाईग्रस्त १९०५९ गावांसाठी सवलती जाहीर केल्या होत्या़ त्यात वीजबिलात ३३़५० टक्के सूट देण्यात आली होती़ तसेच १९ डिसेंबरच्या अन्य एका निर्णयानुसार जुलै ते सप्टंेबर २०१४ या काळात कृषिपंपधारकांना पूर्ण वीजबिलमाफी दिली होती़ तसेच पुन्हा २२ डिसेंबरच्या निर्णयानुसार औद्योगिक ग्राहकांना ही सवलत पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता़या सर्व सवलतींमुळे महावितरणने राज्य शासनाकडे ८६६ कोटींची मागणी केली होती़ त्यानुसार, उद्योग व ऊर्जा खात्याने बुधवारी हे अर्थसाहाय्य महावितरणला अदा केले आहे़-----महावितरणच्या दप्तरी राज्यात एकूण ३६ लाख ६७ हजार ८८३ कृषिपंपधारक वीजग्राहक असून यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी भागांतील शेतकर्यांचा समावेश आहे़ यामुळे राज्य शासनाने जुलै ते सप्टेंबर अखेरपर्यंत कृषिपंपधारकांना १०० टक्के वीजमाफी देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा त्यांना मोठा फायदा घेतला आहे़