शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

९०० वर्षांच्या दुष्काळामुळे सिंधू संस्कृती लयास गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:41 PM

सलग ९०० वर्षे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे सुमारे ४,३५० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अस्ताला गेली, असा निष्कर्ष खडगपूर आयआयटीच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती काढला आहे. त्यावेळी २०० वर्षे दुष्काळ पडला होता हा आजवरचा समजही यामुळे चुकीचा ठरला आहे.

खडगपूर : सलग ९०० वर्षे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे सुमारे ४,३५० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अस्ताला गेली, असा निष्कर्ष खडगपूर आयआयटीच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती काढला आहे. त्यावेळी २०० वर्षे दुष्काळ पडला होता हा आजवरचा समजही यामुळे चुकीचा ठरला आहे.खडगपूर आयआयटीच्या भूगर्भशास्त्र व भूभौतिकी विभागातील संशोधकांनी केलेल्या या संशोधनाचा शोधनिबंध ‘एल्सविर क्वार्टर्ली इंटरनॅशनल जर्नल’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकात याच महिन्यात प्रसिद्ध केला जाणार आहे.या अभ्यासात वैज्ञानिकांनी पाच हजार वर्षांच्या कालखंडातील पाऊसमानातील बदलांचा अभ्यास केला. सिंधू नदीसमुहातील नद्यांचा मुख्य जलस्रोतातूनच लेह-लडाखमधील त्सो मोरिरी सरोवरासही पाणी मिळते. आयआयटीच्या वैज्ञानिकांनी त्या भागातील पाऊसपाण्याच्या प्रमामाचाही पाच हजार वर्षांच्या कालखंडाचा अभ्यास केला आणि पाऊस केव्हा समाधानकारक झाला, केव्हा कमी झाला किंवा केव्हा अजिबात गायब झाला याचे काळ निश्चित केले. भूगर्भशास्त्र विभागातीलज्येष्ठ अध्यापक आणि या संशोधकांच्या चमूचे नेते डॉ.अनिल कुमार गुप्ता यांनी सांगितले की, ख्रिस्तपूर्व २,३५० ते १,४५० (सुमारे ४,३५० वर्षांपूर्वी) या कालखंडात सिंधू संस्कृतीच्या प्रदेशात पाऊस खूपच कमी झाल्याने भाषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. (वृत्तसंस्था)रहिवाशांचे पूर्व तसेच दक्षिणेकडे स्थलांतरवायव्य हिमालयात पावसाने सुमारे ९०० वर्षे दडी मारल्याने सिंधू संस्कृती ज्या नद्यांच्या काठांवर विकसित झाली होती त्या पार आटून गेल्या. यामुळे या नगरांमध्ये एरवी कणखरपणे वास्तव्य करून राहिलेल्यांना नाईलाजाने जेथे पाऊसपाणी बरे होते अशा पूर्व व दक्षिणेकडे स्थलांतर करावे लागले.

टॅग्स :droughtदुष्काळ