शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:54 IST

Rahul Gandhi News:

भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताने नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला होता. या गोळीबारात नियंत्रण रेषेजवळच्या अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली होती. त्यात पुंछमध्ये सर्वाधिक नुकसान झाले होते. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे जात पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची विचारपूस केली. यावेळी काही शालेय विद्यार्थ्यांशीही संवाद साधत राहुल गांधी यांनी त्यांना धीर दिला.

यावेळी राहुल गांधी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही धोका आणि भयावह परिस्थिती पाहिला आहे. मात्र काळजी करू नका, सारंकाही ठीक होईल. या आव्हानाचा सामना करायचा असेल तर तुम्ही खूप शिका, खूप खेळा आणि शाळेमध्येही खूप मित्र बनवा.

राहुल गांधी यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याबद्दल काँग्रेसचे जम्मू काश्मीरमधील प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कर्दा यांनी सांगितले की, सर्वाधिक नुकसान हे पुंछमध्ये झालं आहे. राहुल गांधी यांनी या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या नागरिकांची भेट घेतली, त्यांच्या नुकसान झालेल्या घरांचीही पाहणी केली.  

दरम्यान, भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान ७ ते ९ मेदरम्यान, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबार, क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात एकट्या पुंछमध्ये ७० हून अधिक लोक जखमी झाले होते. हजारो लोकांना नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळच्या क्षेत्रातून पलायन करून सरकारी शिबिरात आश्रय घ्यावा लागला होता. चार दिवस चाललेल्या या संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानने १० मे रोजी युद्धविराम घोषित केला होता.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसOperation Sindoorऑपरेशन सिंदूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान