शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:54 IST

Rahul Gandhi News:

भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताने नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला होता. या गोळीबारात नियंत्रण रेषेजवळच्या अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली होती. त्यात पुंछमध्ये सर्वाधिक नुकसान झाले होते. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे जात पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची विचारपूस केली. यावेळी काही शालेय विद्यार्थ्यांशीही संवाद साधत राहुल गांधी यांनी त्यांना धीर दिला.

यावेळी राहुल गांधी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही धोका आणि भयावह परिस्थिती पाहिला आहे. मात्र काळजी करू नका, सारंकाही ठीक होईल. या आव्हानाचा सामना करायचा असेल तर तुम्ही खूप शिका, खूप खेळा आणि शाळेमध्येही खूप मित्र बनवा.

राहुल गांधी यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याबद्दल काँग्रेसचे जम्मू काश्मीरमधील प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कर्दा यांनी सांगितले की, सर्वाधिक नुकसान हे पुंछमध्ये झालं आहे. राहुल गांधी यांनी या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या नागरिकांची भेट घेतली, त्यांच्या नुकसान झालेल्या घरांचीही पाहणी केली.  

दरम्यान, भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान ७ ते ९ मेदरम्यान, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबार, क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात एकट्या पुंछमध्ये ७० हून अधिक लोक जखमी झाले होते. हजारो लोकांना नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळच्या क्षेत्रातून पलायन करून सरकारी शिबिरात आश्रय घ्यावा लागला होता. चार दिवस चाललेल्या या संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानने १० मे रोजी युद्धविराम घोषित केला होता.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसOperation Sindoorऑपरेशन सिंदूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान