शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

पोलिस, सरकारची वाट पाहू नका, घुसखोर दिसताच पाय तोडा, पळवा; हिमंता बिश्वा सरमांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 10:17 IST

सरकार करेल, पोलिस करतील असे चालणार नाही. हे घुसखोर म्हणजे कॅन्सर आहेत. हे सगळेच बदलून टाकतात. यामुळे लोकांनी त्यांना पाहिले की त्यांचे पाय तोडून टाका, पोलिसांनी पाहिले तर पोलिसांनी तोडावेत, असे वक्तव्य सरमा यांनी केले आहे.

भाजपाला ४०० जागा का हव्यात याचे कारण सांगणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्वा सरमांनी घुसखोर दिसले की त्यांचे पाय तोडण्याचे आदेश लोकांना देत वादग्रस्त विधान केले आहे. जर झारखंडला वाचवायचे असेल तर घुसखोर दिसताच त्यांचे पाय तोडा आणि पळवून लावा असे ते म्हणाले आहेत.

सरकार करेल, पोलिस करतील असे चालणार नाही. हे घुसखोर म्हणजे कॅन्सर आहेत. हे सगळेच बदलून टाकतात. यामुळे लोकांनी त्यांना पाहिले की त्यांचे पाय तोडून टाका, पोलिसांनी पाहिले तर पोलिसांनी तोडावेत. झारखंडमध्ये बांग्लादेशी घुसखोर आहेत, त्यांना काँग्रेस-झामुमो सरकारचा पाठिंबा आहे. ३० वर्षांपूर्वी आसाममध्येही घुसखोर येण्यास सुरुवात झाली होती. तेव्हाच्या सरकारने घुसखोरी रोखण्यासाठी पाऊले उचलली नाहीत. यामुळे आता ही समस्या एवढी भीषण बनली आहे की ११ जिल्ह्यांची लोकसंख्याच बदलून गेली आहे. आता आम्ही तिथे अल्पसंख्यांक बनलो आहोत. जर इथे त्यांना रोखले नाही तर पूर्ण झारखंडची हीच परिस्थिती होणार आहे, असा इशारा सरमा यांनी दिला. 

झारखंडच्या गिरीडीह आणि रामगढ जिल्ह्यातील प्रचारसभेला ते संबोधित करत होते. राहुल गांधी कधीही भारताचे पंतप्रधान बनू शकणार नाहीत. जर त्यांना पीएम व्हायचेच असेल तर त्यांनी पाकिस्तानला जाऊन त्यांची इच्छा पूर्ण करावी. आम्ही त्यांना पासपोर्ट, व्हिसा बनविण्यास मदत करू. देशाचे पंतप्रधान पद मोदींसाठीच बुक आहे, असे सरमा म्हणाले. 

यावेळी ४०० जागा आल्या तर पीओके भारतात येईल, युसीसी लागू होईल. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात धर्माच्या नावे मुस्लिमांना आरक्षण देण्याचे काँग्रेसकडून जे प्रयत्न सुरु आहेत ते संपविता येतील असे सरमा म्हणाले. 

टॅग्स :Assamआसामjharkhand lok sabha election 2024झारखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा