शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पोलिस, सरकारची वाट पाहू नका, घुसखोर दिसताच पाय तोडा, पळवा; हिमंता बिश्वा सरमांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 10:17 IST

सरकार करेल, पोलिस करतील असे चालणार नाही. हे घुसखोर म्हणजे कॅन्सर आहेत. हे सगळेच बदलून टाकतात. यामुळे लोकांनी त्यांना पाहिले की त्यांचे पाय तोडून टाका, पोलिसांनी पाहिले तर पोलिसांनी तोडावेत, असे वक्तव्य सरमा यांनी केले आहे.

भाजपाला ४०० जागा का हव्यात याचे कारण सांगणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्वा सरमांनी घुसखोर दिसले की त्यांचे पाय तोडण्याचे आदेश लोकांना देत वादग्रस्त विधान केले आहे. जर झारखंडला वाचवायचे असेल तर घुसखोर दिसताच त्यांचे पाय तोडा आणि पळवून लावा असे ते म्हणाले आहेत.

सरकार करेल, पोलिस करतील असे चालणार नाही. हे घुसखोर म्हणजे कॅन्सर आहेत. हे सगळेच बदलून टाकतात. यामुळे लोकांनी त्यांना पाहिले की त्यांचे पाय तोडून टाका, पोलिसांनी पाहिले तर पोलिसांनी तोडावेत. झारखंडमध्ये बांग्लादेशी घुसखोर आहेत, त्यांना काँग्रेस-झामुमो सरकारचा पाठिंबा आहे. ३० वर्षांपूर्वी आसाममध्येही घुसखोर येण्यास सुरुवात झाली होती. तेव्हाच्या सरकारने घुसखोरी रोखण्यासाठी पाऊले उचलली नाहीत. यामुळे आता ही समस्या एवढी भीषण बनली आहे की ११ जिल्ह्यांची लोकसंख्याच बदलून गेली आहे. आता आम्ही तिथे अल्पसंख्यांक बनलो आहोत. जर इथे त्यांना रोखले नाही तर पूर्ण झारखंडची हीच परिस्थिती होणार आहे, असा इशारा सरमा यांनी दिला. 

झारखंडच्या गिरीडीह आणि रामगढ जिल्ह्यातील प्रचारसभेला ते संबोधित करत होते. राहुल गांधी कधीही भारताचे पंतप्रधान बनू शकणार नाहीत. जर त्यांना पीएम व्हायचेच असेल तर त्यांनी पाकिस्तानला जाऊन त्यांची इच्छा पूर्ण करावी. आम्ही त्यांना पासपोर्ट, व्हिसा बनविण्यास मदत करू. देशाचे पंतप्रधान पद मोदींसाठीच बुक आहे, असे सरमा म्हणाले. 

यावेळी ४०० जागा आल्या तर पीओके भारतात येईल, युसीसी लागू होईल. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात धर्माच्या नावे मुस्लिमांना आरक्षण देण्याचे काँग्रेसकडून जे प्रयत्न सुरु आहेत ते संपविता येतील असे सरमा म्हणाले. 

टॅग्स :Assamआसामjharkhand lok sabha election 2024झारखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा