शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

इंदौरमध्ये दूषित पाण्याने मृत्यूतांडव; प्रश्न विचारल्यावर मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पत्रकाराला केली शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:10 IST

Indore Water Contamination Deaths: दूषित पाण्यावरून विचारलेल्या प्रश्नावर मंत्री कैलाश विजयवर्गीय भडकल्याचे पाहायला मिळाले.

Indore Water Contamination: देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदौरमध्ये दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. या गंभीर मुद्द्यावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी जाहीरपणे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली, ज्यामुळे अखेर विजयवर्गीय यांना माफी मागावी लागली आहे.

बुधवारी रात्री कैलाश विजयवर्गीय त्यांच्या इंदौर-१ विधानसभा मतदारसंघातील भागीरथपुरा भागात परिस्थितीचा आढावा घेत होते. यावेळी एका पत्रकाराने त्यांना दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंबाबत आणि रुग्णालयांच्या बिलांचा परतावा न मिळाल्याबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नावर विजयवर्गीय यांचा संयम सुटला. त्यांनी कॅमेऱ्यासमोरच पत्रकाराला "नॉनसेन्स प्रश्न विचारू नकोस, तू काय ****** होऊन आला आहेस का?" अशा शब्दांत अपमानित केले.

मृतांच्या आकड्यावरून गोंधळ

भागीरथपुरा भागात ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळल्यामुळे कॉलरा आणि डायरियाचा प्रादुर्भाव झाला आहे. अधिकृत आकडा ७ असला तरी, स्थानिक अहवालानुसार १० ते १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या २१२ हून अधिक लोक रुग्णालयात उपचार घेत असून ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली असून मोफत उपचारांचे आदेश दिले आहेत.

वाढत्या दबावानंतर माफीनामा

विजयवर्गीय यांच्या अभद्र भाषेमुळे पत्रकार संघटना आणि विरोधक आक्रमक झाले. चहुबाजूंनी टीका झाल्यावर त्यांनी एक्सवर पोस्ट लिहीत माफी मागितली. "गेल्या दोन दिवसांपासून आम्ही न झोपता परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या माणसांना गमावल्याच्या दुखात माझ्याकडून चुकीचे शब्द निघून गेले, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो," असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचा जोरदार प्रहार

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी यांनी या घटनेवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. "भाजप नेत्यांचा अहंकार सातव्या अस्मानावर आहे. जनतेचा मृत्यू होत असताना मंत्री जबाबदारी झटकून शिवीगाळ करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा अभद्र मंत्र्याचा तातडीने राजीनामा घ्यावा," अशी मागणी पटवारी यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indore Water Crisis: Minister's Abuse Sparks Outrage After Deaths

Web Summary : Indore faces a deadly water crisis. Minister Kailash Vijayvargiya verbally abused a journalist questioning deaths, sparking outrage. Facing criticism, he apologized. Official reports say 7 died, but local reports claim more. Congress demands his resignation.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूWaterपाणी