शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बापरे! लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी गाढवाचं मास खाताहेत लोक; या राज्यात सर्वाधिक गाढवांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 14:30 IST

Trending Viral News in Marathi : हे मांस विकणारे लोक एक गाढव विकत घेण्यासाठी  १५ ते २० हजार रुपये मोजत आहेत. अशा स्थितीत मांस मिळवण्यासाठी गाढवांना अंधाधुंध कापलं जात आहे. या प्रकाराला रोखणं आता सरकारपुढे मोठं आव्हान ठरत आहे.

देशात गाढवांच्या अनेक प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच गाढवांच्या संख्येत वाढ झाली नाही तर या प्राण्याच्या प्रजाती पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. जनावरांची संख्या कमी होण्यामागे मांसासाठी त्यांची होणारी हत्या हे सगळ्यात मोठं कारण आहे. भारतीय खाद्य सुरक्षा प्रधिकरण म्हणजेच एफएसएसआयनं दिलेल्या माहितीनुसार  गाढवं प्राणी खाद्याच्या नावावर नोंदणीकृत नाहीत. म्हणून त्यांना मारणं अवैध आहे. 

आंध्र प्रदेशातील गाढवं नामशेष  होण्याच्या मार्गावर आहेत. गाढवांना मारून त्यांचे अवशेष फेकून दिले जात आहेत.  त्यामुळेच लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे. बाजारात जवळपास गाढवाचं मास ६०० रूपये किलोंनी विकलं जात आहे. हे मास विकणारे लोक एक गाढव विकत घेण्यासाठी  १५ ते २० हजार रुपये मोजत आहेत. अशा स्थितीत मांस मिळवण्यासाठी गाढवांना अंधाधुंध कापलं जात आहे. या प्रकाराला रोखणं आता सरकारपुढे मोठं आव्हान ठरत आहे.

भारतात गाढवाच्या मांसाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर लोक खाण्यासाठी करत आहेत. आंध्र प्रदेशात गाढवांच्या मांसाबाबत अनेक मान्यता आहेत. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गाढवाच्या मासांमुळे अनेक समस्यांपासून मुक्तता मिळवता येऊ शकते. गाढवाचं मास खाल्ल्यामुळे लैंगिक शक्ती वाढते असं त्यांचं मत आहे. त्यामुळे जेवणात गाढवाच्या मासाचं प्रमाण वाढवलं आहे. आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये गाढवांना मारलं जात आहे. यात कृष्णा, प्रकाशम, गुंटूरसह अन्य काही भागांचा समावेश आहे. याठिकाणच्या लोकांमध्ये गाढवाचं मास खाण्याचे प्रमाण वाढले आहे.

एनिमल रेस्क्यू ऑर्गनाईजेशनचे सदस्य गोपाल, आर सुरबाधुला यांनी सांगितले की, ''वास्तविक पाहता गाढवांवर हे मोठं संकट ओढावलं आहे.  या राज्यात गाढवं जवळ जवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या गाढवांना अवैधरित्या मारलं जात आहे. स्थानिक नगरपालिका सुप्रिम कोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध आहे.''  खरं की काय? आकाशातून पडलेली दगडं गोळा करता करता करोडपती बनला हा माणूस; तुम्ही काय करताय?

२०१९ मध्ये आंध्र प्रदेशात गाढवांची लोकसंख्या फक्त ५ हजार इतकी होती.  त्याचवर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रातही गाढवांची संख्या वेगानं कमी होत आहे. त्यावेळी तत्कालीन पशू अधिकारी आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी गाढवांना अवैधरित्या मारण्याचं वाढतं प्रमाण लोकसंख्या कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले होते. सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशJara hatkeजरा हटके