शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

बापरे! लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी गाढवाचं मास खाताहेत लोक; या राज्यात सर्वाधिक गाढवांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 14:30 IST

Trending Viral News in Marathi : हे मांस विकणारे लोक एक गाढव विकत घेण्यासाठी  १५ ते २० हजार रुपये मोजत आहेत. अशा स्थितीत मांस मिळवण्यासाठी गाढवांना अंधाधुंध कापलं जात आहे. या प्रकाराला रोखणं आता सरकारपुढे मोठं आव्हान ठरत आहे.

देशात गाढवांच्या अनेक प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच गाढवांच्या संख्येत वाढ झाली नाही तर या प्राण्याच्या प्रजाती पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. जनावरांची संख्या कमी होण्यामागे मांसासाठी त्यांची होणारी हत्या हे सगळ्यात मोठं कारण आहे. भारतीय खाद्य सुरक्षा प्रधिकरण म्हणजेच एफएसएसआयनं दिलेल्या माहितीनुसार  गाढवं प्राणी खाद्याच्या नावावर नोंदणीकृत नाहीत. म्हणून त्यांना मारणं अवैध आहे. 

आंध्र प्रदेशातील गाढवं नामशेष  होण्याच्या मार्गावर आहेत. गाढवांना मारून त्यांचे अवशेष फेकून दिले जात आहेत.  त्यामुळेच लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे. बाजारात जवळपास गाढवाचं मास ६०० रूपये किलोंनी विकलं जात आहे. हे मास विकणारे लोक एक गाढव विकत घेण्यासाठी  १५ ते २० हजार रुपये मोजत आहेत. अशा स्थितीत मांस मिळवण्यासाठी गाढवांना अंधाधुंध कापलं जात आहे. या प्रकाराला रोखणं आता सरकारपुढे मोठं आव्हान ठरत आहे.

भारतात गाढवाच्या मांसाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर लोक खाण्यासाठी करत आहेत. आंध्र प्रदेशात गाढवांच्या मांसाबाबत अनेक मान्यता आहेत. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गाढवाच्या मासांमुळे अनेक समस्यांपासून मुक्तता मिळवता येऊ शकते. गाढवाचं मास खाल्ल्यामुळे लैंगिक शक्ती वाढते असं त्यांचं मत आहे. त्यामुळे जेवणात गाढवाच्या मासाचं प्रमाण वाढवलं आहे. आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये गाढवांना मारलं जात आहे. यात कृष्णा, प्रकाशम, गुंटूरसह अन्य काही भागांचा समावेश आहे. याठिकाणच्या लोकांमध्ये गाढवाचं मास खाण्याचे प्रमाण वाढले आहे.

एनिमल रेस्क्यू ऑर्गनाईजेशनचे सदस्य गोपाल, आर सुरबाधुला यांनी सांगितले की, ''वास्तविक पाहता गाढवांवर हे मोठं संकट ओढावलं आहे.  या राज्यात गाढवं जवळ जवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या गाढवांना अवैधरित्या मारलं जात आहे. स्थानिक नगरपालिका सुप्रिम कोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध आहे.''  खरं की काय? आकाशातून पडलेली दगडं गोळा करता करता करोडपती बनला हा माणूस; तुम्ही काय करताय?

२०१९ मध्ये आंध्र प्रदेशात गाढवांची लोकसंख्या फक्त ५ हजार इतकी होती.  त्याचवर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रातही गाढवांची संख्या वेगानं कमी होत आहे. त्यावेळी तत्कालीन पशू अधिकारी आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी गाढवांना अवैधरित्या मारण्याचं वाढतं प्रमाण लोकसंख्या कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले होते. सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशJara hatkeजरा हटके