शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 15:21 IST

Rahul Gandhi on Election Commission : "महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि लोकसभेत मत चोरी झाली; आम्ही पुरावे सादर करू."

Rahul Gandhi on Election Commission : राजकीय पक्षांनी घेतलेल्या देणग्यांवरुन देशात अनेकवेळा राजकीय गदारोळ उडाला आहे. कधी देणग्या घेणारे राजकीय पक्ष अडचणीत आले, तर कधी देणगीदारांवर प्रश्न उपस्थित केले गेले. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांनी तर हा मुद्दा लावून धरला होता. आता दैनिक भास्करच्या एका वृत्ताचा हवाला देत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

दैनिक भास्करच्या दाव्यानुार, गुजरातमधील १० निनावी पक्षांना ५ वर्षांत ४३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. राहुल गांधी यांनी यावरुन भाजपला धारेवर धरले आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिले की, "गुजरातमध्ये काही निनावी पक्ष आहेत, ज्यांची कोणी नावेही ऐकली नाहीत. पण, या पक्षांना ४३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या पक्षांनी फार कमी वेळा निवडणुका लढवल्या किंवा त्यावर खर्च केला आहे."

"हे हजारो कोटी कुठून आले? या पक्षांना कोण चालवत आहे? आणि पैसे गेले कुठे? निवडणूक आयोग याची चौकशी करेल, की येथेही प्रतिज्ञापत्र मागेल? की स्वतः कायदा बदलून डेटा लपवतील?" असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. 

निवडणूक आयोगावर मत चोरीचे आरोप 

गेल्या २ महिन्यांपासून राहुल गांधी निवडणूक आयोगावर सातत्याने टीका करत आहेत. यासोबतच निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत असल्याची टीकाही त्यांनी करत आहेत. आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या त्यांनी मतदार हक्क यात्रा काढली आहे. याद्वारे ते राज्यभर दौरा करत आहेत. आज ही यात्रा मुझफ्फरनगरमध्ये पोहोचली. यावेळी रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "प्रत्येक वेळी असे होते की, प्रथम ओपिनियन पोल येतात तेव्हा काँग्रेस जिंकत असल्याचे दिसून येते, परंतु निकालात भाजप जिंकते. २०१४ च्या आधी गुजरातमधून मत चोरीची प्रक्रिया सुरू झाली. गुजरात मॉडेल हे हिट मॉडेल नाही, तर गुजरात मॉडेल हे मत चोरीचे मॉडेल आहे."

गरीबांची मते कापली जात आहेत

"महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि लोकसभेतही मत चोरी झाली. आम्ही कर्नाटकात आमच्या टीम तैनात केल्या आणि भाजपची मत चोरी समोर आणली. आम्ही भविष्यातही त्यांच्या चोरीचे पुरावे सादर करू. संविधानात लिहिले आहे की, एका व्यक्तीला एका मताचा अधिकार आहे, परंतु भाजप यावर हल्ला करत आहे. बिहारमध्ये ज्यांची मते कापली गेली, ते मागास, दलित आणि अल्पसंख्याक होते. भारतातील गरिबांची मते कापली जात आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह मते चोरतात आणि नंतर निवडणुका जिंकतात. निवडणूक आयोग या लोकांना मदत करत आहे," असा आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसBJPभाजपाGujaratगुजरात