शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

राजीव गांधींना जे जमलं नाही ते आम्ही करुन दाखवलं; अमित शहांच्या विधानानंतर राज्यसभेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 1:36 PM

बांगलादेशी घुसखोरांना कोण वाचवू पाहतंय, असा प्रश्न शहांनी उपस्थित केला

नवी दिल्ली: आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी) सुरू झालेलं राजकारण अद्याप थांबलेलं नाही. या यादीत तब्बल 40 लाख नागरिकांची नावं नसल्यानं विरोधकांनी भाजपाला धारेवर धरलं आहे. याचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. काँग्रेसनं आसाम करार अंमलात आणण्याची हिंमत दाखवली नाही. मात्र भाजपा सरकारनं ते धैर्य दाखवलं, असं अमित शहा राज्यसभेतील भाषणादरम्यान म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर राज्यसभेत काँग्रेस खासदारांनी एकच गोंधळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं. 

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचं मूळ काय, हे रजिस्टर कुठून आलं, हे कोणीही सांगत नाही, असं अमित शहा राज्यसभेत म्हणाले. 'अवैध घुसखोरांच्या प्रश्नावर आसाममधील शेकडो तरुण शहीद झाले. 14 ऑगस्ट 1985 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आसाम करार लागू केला. हाच करार नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा आत्मा आहे. घुसखोरांची ओळख पटवून त्यांना सिटिजन रजिस्टरमधून वगळून एक नॅशनल रजिस्टर तयार करायचं, अशी सूचना यामध्ये होती. काँग्रेसच्या पंतप्रधानांनी हा करार केला. मात्र काँग्रेसला हा करार लागू करता आला नाही. आम्ही हिंमत दाखवली आणि या कराराची अंमलबजावणी केली,' असं शहा भाषणात म्हणाले. काँग्रेस अवैधपणे घुसखोरी करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करतेय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर काँग्रेस खासदार आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभा