शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजीव गांधींना जे जमलं नाही ते आम्ही करुन दाखवलं; अमित शहांच्या विधानानंतर राज्यसभेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 14:00 IST

बांगलादेशी घुसखोरांना कोण वाचवू पाहतंय, असा प्रश्न शहांनी उपस्थित केला

नवी दिल्ली: आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी) सुरू झालेलं राजकारण अद्याप थांबलेलं नाही. या यादीत तब्बल 40 लाख नागरिकांची नावं नसल्यानं विरोधकांनी भाजपाला धारेवर धरलं आहे. याचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. काँग्रेसनं आसाम करार अंमलात आणण्याची हिंमत दाखवली नाही. मात्र भाजपा सरकारनं ते धैर्य दाखवलं, असं अमित शहा राज्यसभेतील भाषणादरम्यान म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर राज्यसभेत काँग्रेस खासदारांनी एकच गोंधळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं. 

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचं मूळ काय, हे रजिस्टर कुठून आलं, हे कोणीही सांगत नाही, असं अमित शहा राज्यसभेत म्हणाले. 'अवैध घुसखोरांच्या प्रश्नावर आसाममधील शेकडो तरुण शहीद झाले. 14 ऑगस्ट 1985 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आसाम करार लागू केला. हाच करार नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा आत्मा आहे. घुसखोरांची ओळख पटवून त्यांना सिटिजन रजिस्टरमधून वगळून एक नॅशनल रजिस्टर तयार करायचं, अशी सूचना यामध्ये होती. काँग्रेसच्या पंतप्रधानांनी हा करार केला. मात्र काँग्रेसला हा करार लागू करता आला नाही. आम्ही हिंमत दाखवली आणि या कराराची अंमलबजावणी केली,' असं शहा भाषणात म्हणाले. काँग्रेस अवैधपणे घुसखोरी करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करतेय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर काँग्रेस खासदार आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभा