शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

लग्नात विघ्न, कार झाडावर आदळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 21:23 IST

Accident Case : हे सर्व लोक एका लग्न समारंभात सहभागी होणार होते असे सांगण्यात येत आहे. वाटेत कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी एक अनियंत्रित कार झाडावर आदळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक एका लग्न समारंभात सहभागी होणार होते असे सांगण्यात येत आहे. वाटेत कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी एकाच कुटुंबातील सदस्य वाल्मिकीनगर लव-कुश घाट येथून कारने नवलपूरला जात होते. दरम्यान, हरडियाचाटीजवळील वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचवेळी काही लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालानौरंगिया स्टेशन प्रभारी राजेश झा यांनी सांगितले की, रामबाबू चौधरी, मंटू साहनी, मंटूची मुलगी अर्चना (7) आणि बेबी (3) अशी मृतांची नावे आहेत. ते पुढे म्हणाले की, सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जखमींची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

टॅग्स :Accidentअपघातmarriageलग्नBiharबिहारDeathमृत्यूPoliceपोलिस