शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कोणतं राज्य देतं देशाला सर्वाधिक महसूल?; महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 17:34 IST

उद्योगांच्या बाबतीत गुजरात आणि महाराष्ट्राची वारंवार तुलना होते

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला. २०२४-२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनवर नेण्याचा विश्वास मोदींनी अनेकदा व्यक्त केला आहे. मोदी सरकारनं हे उद्दिष्ट गाठल्यास त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. मात्र अर्थव्यवस्थेचा गाडा केवळ मोजकीच राज्यं हाकणार का, हा खरा प्रश्न आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचं सध्याचं चित्र पाहिल्यास एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच राज्यं महसुली उत्पादनात मोठं योगदान देतात. उत्तर भारतातली अनेक राज्यं आकारानं मोठं असली, तरी त्यांच्याकडून फारसा महसूल केंद्राला मिळत नाही. केंद्रीय थेट कर संकलन विभागानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक या तीन राज्यांमधून देशाला तब्बल ६१ टक्के महसूल मिळतो. याचाच अर्थ उर्वरित सर्व राज्यांमधून देशाच्या तिजोरीत केवळ ३९ टक्के महसूल जातो. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक यांच्या पाठोपाठ तमिळनाडू आणि गुजरातमधून जमा होणारा कर धरल्यास पाच राज्यांमधून केंद्राला ७२ टक्के महसूल मिळतो. यामध्ये व्यक्तींनी आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी भरलेल्या कराचा समावेश आहे. २०१३-१४ ते २०१८-१९ या कालावधीत महाराष्ट्रानं १९,१७,९४४ कोटी रुपयांचा कर दिला. केंद्राला मिळणारा तब्बल ३७.८५ टक्के महसूल एकट्या महाराष्ट्रातून गेला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्लीनं देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल जमा केला आहे. दिल्लीमधून केंद्राला ६,९३,२७५ कोटींचा महसूल मिळाला आहे. देशभरातून केंद्राकडे जमा झालेल्या महसुलातील १३.६८ टक्के वाटा दिल्लीचा आहे. देशाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या राज्यांच्या यादीत कर्नाटक दुसऱ्या स्थानी आहे. कर्नाटकनं केंद्राला ४,९९,३१० कोटींचा महसूल दिला आहे. म्हणजेच देशाच्या एकूण महसुली उत्पन्नात कर्नाटकचा वाटा ९.८ टक्के इतका आहे.कर्नाटकपाठोपाठ तमिळनाडूकडूनही केंद्राला मोठा महसूल मिळतो. २०१३-१४ ते २०१८-१९ या कालावधीत तमिळनाडूनं केंद्राला ३,३९,८३६ कोटी रुपयांचा महसूल करांमधून मिळाला आहे. देशाच्या तिजोरीत जमा झालेला ६.७ टक्के महसूल तमिळनाडूनं दिला आहे. महाराष्ट्रासोबत कायम तुलना होणारा गुजरात महसूलच्या बाबतीत पाचव्या स्थानी आहे. गुजरातकडून गेल्या पाच वर्षांत केंद्राला २,३१,३५७ कोटींचा महसूल मिळाला आहे. देशाच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत हा आकडा ४.५६ टक्के इतका आहे. 

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातdelhiदिल्लीKarnatakकर्नाटक