शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विरोधकांच्या पागल विकास विरोधात भाजपाचा बुलंद विकास, अशी सुरू झाली होती पागल विकासची कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 18:33 IST

"विकास पागल हो गया है" चा नारा देत विरोधकांनी गुजरातमधील तथाकथित विकासाची पोलखोल सुरू केल्याने सत्ताधारी भाजपाचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसने उचलून धरलेल्या  "विकास पागल हो गया है" या घोषणेला आता भाजपानेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

गांधीनगर - विधानसभा निवडणूक अवध्या काही महिन्यांवर आल्याने गुजरातमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच "विकास पागल हो गया है" चा नारा देत विरोधकांनी गुजरातमधील तथाकथित विकासाची पोलखोल सुरू केल्याने सत्ताधारी भाजपाचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसने उचलून धरलेल्या  "विकास पागल हो गया है" या घोषणेला आता भाजपानेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या पागल विकासाविरोधात भाजपाने आपला बुलंद विकासचा नारा दिला आहे. "मी गुजरात आहे, मीच विकास आहे" या घोषणेसह गुजरात भाजपा काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरली आहे.सोशल मीडियामुळे 'विकास पागल हो गया है" हा नारा अल्पावधीच गुजरातमधून देशभरात पोहोचला. हा हॅशटॅग वापरून सरकारला सवाल विचारण्यात येऊ लागले. ज्या पागल विकासचा उल्लेख करून गुजरातमध्ये भाजपाला लक्ष्य केले जात आहे. त्या घोषणेची सुरुवात एका सर्वसामान्य नागरिकाने केलेल्या फेसबूक पोस्टवरून सुरु झाली होती. 20 वर्षांच्या सागर सावलिया नावाच्या तरुणाने फेसबूकवर गुजरातमधील सरकारी बस आणि तिचा तुटलेला टायर टाकून लिहिले होते की, "सरकारी बसगाड्या आमच्या आहेत, पण त्यातून प्रवास करताना सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे, जिथे आहात, तिथेच राहा कारण "विकास पागल हो गया है"त्यानंतर विकास पागल हो गया है हा हॅशटॅग आणि कॅप्शन वापरून लोक आपापल्या परिसरातील बकाल अवस्था सोशल मीडियावर शेअर करू लागले. त्यानंतर विकास कसा वेडा झालाय हे सांगण्याची सोशल मीडियावर लाटच आली. सोशल मीडियावर सुरू झालेल्या या मोहिमेने भाजपाच्या विरोधकांना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकासाच्या घोषणांवर टीका करण्याची आयती संधीच दिली. गुजरातमध्ये काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांनीही या घोषणेचा पुरेपूर वापर करत मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली.  विकासला काय झालं, असे राहुल गांधी यांनी विचारल्यावर उपस्थितांनी "गाडो थई छो" म्हणजेच तो वेडा झाला आहे, असे प्रत्युत्तर दिले. भाजपावर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेनेही आपल्या मुखपत्रातून विकासाच्या मुद्द्यावरून भाजपावर टीकास्र सोडले. दरम्यान, विकास पागल हो गया है ही घोषणा भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने विकासालाच केंद्र बनवले असून, गुजरातमधील विकास बुलंद झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी  मी आहे गुजरात, मी आहे विकास असा नारा देत विरोधकांच्या वेड्या विकासला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसGujaratगुजरातIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी