शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

Kerala Heat Wave: देवभूमी तापली! जिथून मान्सून येतो, त्या केरळमध्ये तापमान 54 डिग्रीवर; देशाचा घाम फोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 08:20 IST

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच केरळमध्ये भीषण गर्मीने हजेरी लावली आहे. केरळमधील काही भागातील तापमान हे 54 डिग्री  सेल्सियसपर्यंत गेले आहे.

देशात उन्हाचा तडाखा कमी करण्यासाठी ज्या राज्यातून मान्सून दाखल होतो, त्या केरळमध्ये तापमानाने एन्ट्री केली आहे. मार्च महिन्यापासून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे, परंतू सरासरीपेक्षा चार ते सहा अंशांनी तापमान वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. परंतू, केरळमध्ये काही भागात नोंदविल्या गेलेल्या तापमानाने देशभराची धडकी भरविली आहे. 

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच केरळमध्ये भीषण गर्मीने हजेरी लावली आहे. केरळमधील काही भागातील तापमान हे 54 डिग्री  सेल्सियसपर्यंत गेले आहे. गुरुवारी केरळच्या प्राधिकरणाने दिलेल्या आकडेवारीत थिरुवनंतपुरम आणि कोझिकोडेच्या काही भागांत एवढे तापमान नोंदविले गेले आहे. अन्य चार जिल्ह्यांत ४५ डिग्री  सेल्सियसच्या पुढे तापमान नोंदविले गेले आहे. तर इतर जिल्ह्यांत ४० डिग्री  सेल्सियस एवढे तापमान नोंदविले गेले आहे. 

केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) ने गुरुवारी अहवाल तयार केला आहे. एवढे प्रचंड तापमान धोकादायक असल्याचे म्हटले आहे. येत्या काळात यामुळे गंभीर आजार आणि उष्माघाताचा धोका कित्येक पटींनी वाढू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. 

थिरुवनंतपुरम जिल्ह्याचा दक्षिण भाग आणि अलप्पुझा, कोट्टायम, कन्नूर जिल्ह्यांतील काही भागात 54 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, कोझिकोड आणि कन्नूर येथे गुरुवारी कमाल तापमान ४५ ते ५४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी या अहवालावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. 

 

टॅग्स :Heat Strokeउष्माघातKeralaकेरळ