शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

महाराष्ट्रासह 11 राज्यांत आढळले डेल्टा प्लसचे रुग्ण; ८ जिल्ह्यांत संक्रमण दर ५ ते ९%

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 06:50 IST

महाराष्ट्राला राहावे लागेल सावध; ८ जिल्ह्यांत संक्रमण दर ५ ते ९%

-नितीन अग्रवालनवी  दिल्ली : महाराष्ट्राला लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करताना जास्त सावध राहावे लागेल, असे आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, राज्यात आजही अनेक जिल्ह्यांत संक्रमणाचा दर सुरक्षित स्तरापेक्षा जास्त असल्यामुळे धोका टळलेला नाही. महाराष्ट्रात १ तर मध्यप्रदेशात डेल्टा प्लसच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, सातारा, पालघर आणि उस्मानाबादेत आजही संक्रमणाचा दर पाच ते ९ टक्के आहे. म्हणून तेथे जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, असे भार्गव म्हणाले. नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे (एनसीडीसी) संचालक डॉ. सुजित कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातच संक्रमणाचा सर्वांत जास्त प्रभाव होता आणि सर्वांत जास्त म्युटेशनही महाराष्ट्रातूनच मिळाले. 

महाराष्ट्रात सर्वांत जास्त

डॉ. सुजित यांनी सांगितले की, ४५ हजार नमुन्यांपैकी देशात ४८ रुग्णांत डेल्टा प्लसची ओळख पटली आहे. त्यात सर्वांत जास्त २० रुग्ण महाराष्ट्र आणि नऊ तामिळनाडूतील आहेत. याशिवाय मध्यप्रदेश ७, केरळ ३. पंजाब आणि गुजरातमध्ये दोन रुग्ण सापडले आहेत. ओदिशा, राजस्थान, जम्मू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही एकेक रुग्ण सापडला आहे.

डेल्टा प्लसबद्दल डॉ. सुजित कुमार म्हणाले की, त्यात प्रतिकार क्षमतेला चुकवून अँटीबॉडीला निष्क्रिय करण्याची क्षमता आहे व काळजीचे हेच कारण आहे. अर्थात त्याचे रुग्ण खूप कमी असून, वैज्ञानिक तथ्यांच्या आधारावर त्याबाबत काही म्हणता येत नाही.

महाराष्ट्रात सर्वांत जास्त म्युटेशन का?

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘राज्यात सर्वांत जास्त लोक संक्रमित झाले. त्यामुळे विषाणूला पसरण्यास तेथेच जास्त संधी मिळाली. याच कारणामुळे विषाणूला स्वरूप बदलण्याची संधी महाराष्ट्रातच मिळाली. आम्ही सावध राहून कोविडच्या नियमांचे पालन केले नाही तर संख्या वाढेल व नव्या लाटेचे संकट येईल.’

डेल्टा प्लसवर लस  किती परिणामकारक ?

भार्गव म्हणाले की, ‘सध्याची लस कोरोनाच्या डेल्टा प्लसवर किती परिणामकारक आहे हे येत्या ७ ते १० दिवसांत समजेल. सध्या देशात १०-१२ राज्यांत याचे फक्त ४८-४९ रुग्ण समोर आले आहेत.’ कोरोना विषाणू दबाव पडल्यावर सुरक्षित राहण्यासाठी स्वत:ला म्युटेशनच्या माध्यमातून बदलून घेतो. ते उपचारानंतर लस, प्लाझ्मा आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या कारणामुळेही होऊ शकते. याशिवाय मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन न केल्यास त्याला जास्त संधी मिळते आणि जास्त म्युटेशन होतात. या परिस्थितीत विषाणूला जास्त शक्तिशाली होण्याची संधी मिळते.  विषाणूने कितीही रूप बदलले तरी बचावासाठी सतर्कता आणि लसीकरणात कोणताही बदल नाही, असे भार्गव म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र