शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

महाराष्ट्रासह 11 राज्यांत आढळले डेल्टा प्लसचे रुग्ण; ८ जिल्ह्यांत संक्रमण दर ५ ते ९%

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 06:50 IST

महाराष्ट्राला राहावे लागेल सावध; ८ जिल्ह्यांत संक्रमण दर ५ ते ९%

-नितीन अग्रवालनवी  दिल्ली : महाराष्ट्राला लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करताना जास्त सावध राहावे लागेल, असे आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, राज्यात आजही अनेक जिल्ह्यांत संक्रमणाचा दर सुरक्षित स्तरापेक्षा जास्त असल्यामुळे धोका टळलेला नाही. महाराष्ट्रात १ तर मध्यप्रदेशात डेल्टा प्लसच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, सातारा, पालघर आणि उस्मानाबादेत आजही संक्रमणाचा दर पाच ते ९ टक्के आहे. म्हणून तेथे जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, असे भार्गव म्हणाले. नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे (एनसीडीसी) संचालक डॉ. सुजित कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातच संक्रमणाचा सर्वांत जास्त प्रभाव होता आणि सर्वांत जास्त म्युटेशनही महाराष्ट्रातूनच मिळाले. 

महाराष्ट्रात सर्वांत जास्त

डॉ. सुजित यांनी सांगितले की, ४५ हजार नमुन्यांपैकी देशात ४८ रुग्णांत डेल्टा प्लसची ओळख पटली आहे. त्यात सर्वांत जास्त २० रुग्ण महाराष्ट्र आणि नऊ तामिळनाडूतील आहेत. याशिवाय मध्यप्रदेश ७, केरळ ३. पंजाब आणि गुजरातमध्ये दोन रुग्ण सापडले आहेत. ओदिशा, राजस्थान, जम्मू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही एकेक रुग्ण सापडला आहे.

डेल्टा प्लसबद्दल डॉ. सुजित कुमार म्हणाले की, त्यात प्रतिकार क्षमतेला चुकवून अँटीबॉडीला निष्क्रिय करण्याची क्षमता आहे व काळजीचे हेच कारण आहे. अर्थात त्याचे रुग्ण खूप कमी असून, वैज्ञानिक तथ्यांच्या आधारावर त्याबाबत काही म्हणता येत नाही.

महाराष्ट्रात सर्वांत जास्त म्युटेशन का?

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘राज्यात सर्वांत जास्त लोक संक्रमित झाले. त्यामुळे विषाणूला पसरण्यास तेथेच जास्त संधी मिळाली. याच कारणामुळे विषाणूला स्वरूप बदलण्याची संधी महाराष्ट्रातच मिळाली. आम्ही सावध राहून कोविडच्या नियमांचे पालन केले नाही तर संख्या वाढेल व नव्या लाटेचे संकट येईल.’

डेल्टा प्लसवर लस  किती परिणामकारक ?

भार्गव म्हणाले की, ‘सध्याची लस कोरोनाच्या डेल्टा प्लसवर किती परिणामकारक आहे हे येत्या ७ ते १० दिवसांत समजेल. सध्या देशात १०-१२ राज्यांत याचे फक्त ४८-४९ रुग्ण समोर आले आहेत.’ कोरोना विषाणू दबाव पडल्यावर सुरक्षित राहण्यासाठी स्वत:ला म्युटेशनच्या माध्यमातून बदलून घेतो. ते उपचारानंतर लस, प्लाझ्मा आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या कारणामुळेही होऊ शकते. याशिवाय मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन न केल्यास त्याला जास्त संधी मिळते आणि जास्त म्युटेशन होतात. या परिस्थितीत विषाणूला जास्त शक्तिशाली होण्याची संधी मिळते.  विषाणूने कितीही रूप बदलले तरी बचावासाठी सतर्कता आणि लसीकरणात कोणताही बदल नाही, असे भार्गव म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र