शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

दिल्लीत पाणी सुद्धा खराब; गुणवत्ता रँकिंग यादीत 'मुंबई' टॉप!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 4:08 PM

देशातील 21 शहरांची यादी जाहीर

नवी दिल्ली : दिल्लीतील हवा नाही तर पाणी सुद्धा प्रदूषित आहे. केंद्र सरकारने देशातील 21 शहरांतील पाण्याची चाचणी केली. यात मुंबईतीलपाणी सर्वोत्तम म्हणजेच स्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. तर दिल्लीतील पाणी खराब असल्याचे आढळून आले. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी पाण्यातील गुणवत्तेच्या आधारावर देशातील 21 शहरांची यादी जाहीर केली आहे. 

या यादीत मुंबई, हैदराबाद, भुवनेश्वर, रांची आणि रायपूर टॉपमध्ये आहेत. त्यानंतर अनुक्रमे अमरावती, शिमला, चंदीगड, त्रिवेंद्रम, पटना, भोपाळ, गुवाहाटी, बंगळुरू, गांधीनगर, लखनऊ, जम्मू, जयपूर, डेहराडून, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली आहे.  

केंद्र सरकारने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सला (बीआयएस) देशातील विविध शहरांतील पाण्याचे नमुने एकत्र करून त्यासंबंधी चौकशी करण्याचे आणि त्यानुसार रँकिंग जारी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार, आज रामविलास पासवान यांनी पाणी गुणवत्ता अहवाल आणि रँकिंग जारी केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पाण्याची चाचणी 10 मानकांवर करण्यात आली आहे. 

मुंबईतील पाणी प्रत्येक मानकांमध्ये पास झाले आहे. तर मानकांनुसार, इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील पाणी खराब असल्याचे दिसून आले. यावेळी रामविलास पासवान म्हणाले,"आम्ही कोणत्याही सरकारला दोष  देत नाही. या विषयावरून आम्ही राजकारण करत नाही. तर आमचे उद्दिष्ट लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचले पाहिजे. त्यामुळे दिल्ली सरकारने समजून घेतले पाहिजे." 

याचबरोबर, देशातील शहरांमध्ये पाणी गुणवत्ता चाचणी यापुढे सुद्धा केली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीन टप्प्यांत चाचणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सर्व राजधानींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सर्व जिल्ह्यांतील पाण्याची चाचणी करण्यात येणार असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले. याशिवाय, प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहोचविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभियान सुरूच राहिल. नरेंद्र मोदींनी 2024 पर्यंत प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोचविणार म्हटले आहे. त्या दिशेने आमचे सरकार काम करत आहे, असेही रामविलास पासवान यांनी सांगितले.    

टॅग्स :WaterपाणीMumbaiमुंबईdelhiदिल्ली