शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

Delhi Violence: कामगार, भाडेकरूंनी कुटुंबे पाठविली गावी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 2:32 AM

अनेक लोकांनी स्थलांतरास केली सुरुवात; ईशान्य दिल्लीतील लोकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराची आग शमली असली तरी स्थानिक तसेच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या रहिवाशांमध्ये अद्याप भीतीचे वातावरण आहे. मागील तीन दिवसांत चांदबाग, मुंगानगर, करावलनगर, घोंडा व गोकुलपुरीमध्ये घडलेल्या हिंसाचारापासून अनेक लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कामासाठी, व्यवसायासाठी या भागात रहिवासी असलेल्या लोकांचा समावेश अधिक आहे.अनेकजण आपल्या कुंटुबियांना खासकरून ज्येष्ठ महिला व मुलांना पाहुण्यांकडे, तसेच आपल्या मूळगावी परत पाठवत आहेत. दुसºया राज्यातून नोकरीसाठी आलेल्या लोकांनीशहरातील दुसºया परिसरात घराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.आता वातावरण शांत झाले असले तरी अचानक कधीही जमाव एकत्र येऊ शकतो. गोळीबार, घोषणाबाजी सुरू होऊ शकते. घरातील लहान मुले घाबरून सतत काय चाललेय, हे विचारायची. त्यामुळे मुले व पत्नीला लखनऊ येथील नातेवाईकांकडे पाठवून दिले, अशी माहिती चांदनगर येथील रहिवासी आरीफ यांनी दिली आहे.घरे रिकामी करण्यास सुरुवातघोंडा परिसरात जे लोक भाडेतत्त्वावर राहत होते, त्यांनीही घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगारही आपल्या गावी जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.मौजपूर परिसरातील अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यामुळे तिथे काम करणाºया कामगारांना आपल्या गावी परत जाण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती रफि क मोहम्मद यांनी दिली आहे.कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवल्यानंतर किमान पुरुषांना निर्धास्तपणे कामाचा शोधही घेता येईल, असेही मत अनेकांनी व्यक्त केले.

टॅग्स :delhi violenceदिल्ली