शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

Delhi Violence: भयंकर...गटारं, नाल्यात सापडत आहेत मृतदेह; दिल्लीतील वेदनादायी दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 5:49 AM

‘आप’ सरकारतर्फे मदत जाहीर; गटारे, नाल्यांत सापडत आहेत मृतदेह

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत गुरुवारी पूर्ण शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तिथे तणाव असून, दुकाने, बाजारपेठा, शाळा, बँका बंदच आहेत. लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. मृतांचा आकडा ३८ वर गेला असून, जखमींची संख्याही वाढून २५० वर गेली आहे. गटारे व नाल्यांत तसेच ढिगाऱ्यांखाली मृतदेह सापडत आहेत. मात्र गोळीबारात किती जण मरण पावले आणि हिंसाचारात किती जणांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही. आम्ही अजिबात गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.हिंसाचार रोखण्यात अपयश आलेल्या गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली, तर काँग्रेस नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे हे सारे घडले, असा आरोप भाजपने केला.भाजपने आम आदमी पक्षावरही असाच आरोप केला. त्यातच आपच्या ताहिर हुसेन या नगरसेवकावर आयबी कर्मचाºयाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली असली तरी आता नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मदत जाहीर केली. मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख, तर गंभीर जखमींना पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच खासगी व सरकारी हॉस्पिटलमधील उपचारांचा खर्चही सरकार उचलेल. त्या भागांतील सर्व पीडितांना सरकारतर्फे मोफत जेवण देण्यात येणार आहे. मदतीसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले असून, त्यावर संपर्क साधावा, आपल्या भागात शांतता व सलोखा ठेवावा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.या भागांत सरकारने शांतता समित्या स्थापन केल्या आहेत. खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमधील उपचाराचा खर्च दिल्ली सरकार ‘फरिश्ते दिल्ली के’ योजनेखाली करणार आहे. हिंसाचार व जाळपोळीत संपत्तीचे नुकसान झालेल्यांना त्यांची कागदपत्रे पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारतर्फे शिबिर घेण्यात येत आहे. ज्यांची वाहने वा दुकाने जळाली आहेत, त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी राज्य सरकार विमा कंपन्यांशी चर्चा करणार आहे. व्यावसायिकांना वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यासाठीही सरकार मदत करेल; तसेच सरकार त्यांना अनुदान देईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४८ एफआयआर दाखल झाले असून, १३० जणांना अटक झाली आहे; तसेच ५० मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सोशल मीडियाद्वारे हिंसाचार भडकविल्याचा पोलिसांचा संशय आहे.एसआयटीकडे तपासहिंसाचाराचा तपास दोन विशेष तपास पथकांकडे (एसआयटी) देण्यात आला आहे. गुन्हे शाखेने सर्व प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) पथकाकडे सुपुर्द केले आहेत.आमच्याकडे अनेक फूटेज असून, त्यांची तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हिंसाचारग्रस्त भागात ३५० शांतता समित्या स्थापन केल्या आहेत.त्यांना दुप्पट शिक्षा द्याहिंसाचारात जे दोषी आढळतील त्यांना दुप्पट शिक्षा द्यावी, असे केजरीवाल म्हणाले. हिंसाचाराला प्रोत्साहन देणे किंवा प्रक्षोभक भाषण करणे यासाठी कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे हे पाहू नये. माझ्या मंत्रिमंडळातील कुणी असेल तर त्यालाही सोडू नका. त्यांना थेट कारागृहात पाठवा, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. देशाच्या सुरक्षेशी संबंधित ही बाब असल्याने कुणीही राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.

टॅग्स :delhi violenceदिल्ली