शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

दिल्ली सेवा विधेयक कायदा बनले! राष्ट्रपतींची मंजुरी, भारत सरकारची अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 13:05 IST

दिल्ली सेवा विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. या विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली आहे. भारत सरकारने त्याची अधिसूचना जारी केली आहे.

दिल्ली सेवा विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. आता दिल्लीत कायदा झाला आहे. भारत सरकारच्या अधिसूचनेत, गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली कायदा २०२३ लागू करण्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १ ऑगस्ट रोजी संसदेत राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार विधेयक, २०२३ सादर केले होते. 

धीर, अधीर अन् बधिर!  ज्या मणिपूरमुळे हा अविश्वासाचा अध्याय रचला गेला त्या...

सरकारने म्हटले आहे की, या कायद्याला राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली (सुधारणा) कायदा, २०२३ असे म्हटले जाईल. हा कायदा १९ मे २०२३ पासून लागू मानले जाईल. काही तरतुदी नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली ऍक्ट, १९९१ सरकारच्या कलम 2 च्या खंड (ई) मध्ये समाविष्ट केल्या होत्या. 'लेफ्टनंट गव्हर्नर' म्हणजे दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशासाठी घटनेच्या कलम २३९ अंतर्गत नियुक्त केलेला आणि राष्ट्रपतींद्वारे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त केलेला प्रशासक असणार आहे.

राष्ट्रीय राजधानीतील अधिकार्‍यांचे निलंबन आणि चौकशी यासारख्या कृती केंद्राच्या नियंत्रणाखाली असतील, असा प्रस्ताव या विधेयकात आहे. मणिपूर हिंसाचारावर लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ होत असताना १ ऑगस्ट रोजी तो संसदेत मांडण्यात आला होता. बहुतांश विरोधी पक्ष या विधेयकाच्या विरोधात होते.

दिल्ली सेवा विधेयकावर चर्चेनंतर १ ऑगस्टच्या संध्याकाळी राज्यसभेत मतदान झाले. यामध्ये दिल्ली सेवा विधेयक १३१ मतांनी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या विरोधात फक्त १०२ मते पडली. राज्यसभेत मतदानासाठी अगोदर मशीनद्वारे मतदानाची तरतूद स्पष्ट करण्यात आली. मात्र काही वेळाने उपसभापतींनी मशीनमध्ये काही बिघाड असल्याने स्लिपद्वारे मतदान होणार असल्याचे जाहीर केले. याआधी हे विधेयक विरोधी पक्षांच्या बहिष्कारात लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले होते. 

विधेयक सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन नाही: अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितले होते की, हे विधेयक कोणत्याही कोनातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत नाही याचा पुरावा देऊ. हे विधेयक म्हणजे दिल्लीतील केंद्र सरकारच्या विद्यमान अध्यादेशाची जागा घेण्याचा प्रयत्न आहे. शहा म्हणाले की, हे विधेयक कोणत्याही पंतप्रधानांना वाचवण्यासाठी नाही. काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, असा गदारोळ होत असताना अमित शहा म्हणाले, ‘आप’च्या मांडीवर बसलेल्या काँग्रेसने हे विधेयक यापूर्वी आणले होते.

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाAmit Shahअमित शाहArvind Kejriwalअरविंद केजरीवाल