शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

गाझीपूर बॉर्डरवर खिळे काढतानाच्या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? पोलिसांनी सांगितलं...

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 04, 2021 2:00 PM

हे खिळे काढतानाचा एक व्हिडो गुरुवारी समोर आला. यात खिळे काढतानाचे दृष्य दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील गाझीपूर बॉर्डरवरील रस्त्यांवर ठोकण्यात आलेले खिळे काढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर आता दिल्लीपोलिसांनी स्पष्टिकरण दिले आहे. हे खिळे काढण्यात येत नसून, ते व्यवस्थित केले जात आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर सीमेवरील स्थिती पूर्वीसारखीच आहे. त्यात कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. हे खिळे लावल्यावरून दिल्ली पोलिसांना सोशल मीडिया आणि राजकीय स्थरावरही मोठ्या टीकांचा सामना करावा लागला आहे. 

हे खिळे काढतानाचा एक व्हिडो गुरुवारी समोर आला. यात खिळे काढतानाचे दृष्य दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर स्पष्टिकरण देत दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे, की सीमेवरील स्थिती पूर्वीप्रमाणेच आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेयर करून गाझीपूर बॉर्डरवरील खिळे काढले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे चुकीचे आहे. हे खिळे काढण्यात येत नसून, व्यवस्थित केले जात आहेत. 

डेलिगेशन गाझीपूर बॉर्डरवर -आज गुरुवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे एक प्रतिनिधिमंडळ शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गाझीपूर बॉर्डरवर पोहोचले आहे. मात्र, या प्रतिनिधिमंडळातील नेत्यांना दिल्ली बॉर्डरवरच अटक करण्यात आली. तेसेच त्यांना आंदोलकांना भेटण्याची परवाणगी देण्यात आली नाही. 

या प्रतिनिधिमंडळातील माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी म्हटले आहे, की बॉर्डरवर तीन किलोमीटरपर्यंत बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. अम्हाला शेतकऱ्यांना भेटण्यापूसन रोखण्यात आले आहे. 13 लेवलची बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. या प्रतिनिधीमंडळात, कौर यांच्या शिवाय एनसीपी खासदार सुप्रिया सुळे, डीएमके खासदार कनिमोझी, टीएमसी खासदार सौगत रॉय यांच्यासह अनेक नेते सामील आहेत.

आंदोलकांना रोखण्यासाठी ठोकले खिळे -प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीतदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी आता अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. या आंदोलकांना पुन्हा दिल्लीत खुसण्यापासून रोखण्यासाठी रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर गाझीपूर बॉर्डरच्या चारही बाजूंनी सीमेंटचे बॅरिकेडदेखील तयार करण्यात आले आहेत. तसेच रस्त्यांवर खिळेदेखील ठोकण्यात आले आहेत. याशिवाय, तारांच्या सहाय्यानेही बॉर्डरला घेरण्यात आले आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपUttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीPoliceपोलिसGovernmentसरकार