शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 21:21 IST

Farmer Protest : . दिल्लीचा पाणीपुरवठा थांबवू, दिल्लीचे रस्ते बंद करू, दिल्लीला घेराव घालून बसू. असं म्हणणं योग्य नाही. ही लाहोर-कराची नाही, ही देशाची राजधानी आहे

चंदिगड - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, हरयाणा सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन थांबवून मध्यममार्ग काढावा. त्यामुळे दिल्लीच्या नागरिकांना त्रास होणार नाही. शेतकऱ्यांनी सदसदविवेकबुद्धीने विचार करावा, असे आवाहन हरयाणाचे कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी केले आहे.जे. पी. दलाल यांनी सांगितले की, मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की, त्यांनी सदबुद्धीने विचार करावा. चर्चा करावी. दिल्लीचा पाणीपुरवठा थांबवू, दिल्लीचे रस्ते बंद करू, दिल्लीला घेराव घालून बसू. असं म्हणणं योग्य नाही. ही लाहोर-कराची नाही, ही देशाची राजधानी आहे.दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही शेतकऱ्यांना आवाहान केले होते. ते म्हणाले होते की, हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. तसेच दीर्घकाळानंतर त्यामध्ये सुधारणा केल्या जात आहेत. मात्र जर त्यांना त्यामध्ये काही अडचणी जाणवत असतील तर आम्ही त्यांच्या चिंतांबाबत चर्चा करण्यास तयार आहोत. आम्ही उद्या शेतकऱ्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहोत. तसेच कुठपर्यंत तोडगा निघेल याची चाचपणी करणार आहोत.दरम्यान, दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सचाही पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याची घोषणा केली आहे.सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी शेतकऱ्यांकडून मात्र आंदोलन सुरू आहे. चिल्ला बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्याशी चर्चा करावी, असा आग्रह धरला आहे. दरम्यान, शेतकरी आणि केंद्र सरकारमधील काल झालेली बैठक अनिर्णित राहिली आहे.एआयएमटीसी गुड्स व्हेईकल ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करते. याअंतर्गत सुमारे दहा मिलियन म्हणजेच १ कोटी ट्रकर्स येतात. देशात सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये यांचे मोठे योगदान असते. आता आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याच येणार असल्याचा इशारा एआयएमटीसीने दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीHaryanaहरयाणा