शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Delhi Election: दिल्लीकरांकडून देशाच्या राजकारणाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 6:28 AM

अरविंद केजरीवाल : काम करणाऱ्यालाच दिली मते; हनुमान मंदिरात जाऊ न घेतले दर्शन

नवी दिल्ली : या निकालांनी नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे. काम करणाºयालाच मत मिळेल, असा स्पष्ट संदेश देत दिल्लीकरांनी देशातील राजकारणाला कलाटणी दिली आहे, या शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दमदार विजयानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

आम आदमी पार्टीच्या कार्यालयात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक गोळा झाले होते. ‘लगे रहो केजरीवाल’च्या घोषणा सुरू होत्या. केजरीवाल यांचे मंचावर आगमन होताच एकच जल्लोष झाला. केजरीवाल यांनी पहिल्याच वाक्यात निवडणुकीतील विजय दिल्लीकरांना समर्पित केला.ते म्हणाले, ज्यांनी मला आपल्या कुटुंबातील मुलगा म्हणून स्वीकारले त्या दिल्लीकरांचा हा विजय आहे. विकासाचे आणि कामाचे राजकारण करणाऱ्यांचा हा विजय आहे. या निकालामुळे संपूर्ण देशातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. जो दर्जेदार शिक्षण देईल, जो मोहल्ला क्लिनिक देईल, चोवीस तास वीज देईल, स्वच्छ पाणी देईल त्यालाच मत मिळेल, अशालाच दिल्लीकरांनी विजयी केले. देशासाठी हा शुभ संदेश आहे, हा संपूर्ण देशाचा विजय आहे, असे सांगून केजरीवाल यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि खंबीरपणे पाठीशी उभे राहणाºया कुटुंबीयांचे आभार मानले.

माझा वाढदिवस आम्ही केक कापून साजरा केला, पण खरे सेलिब्रेशन निकालामुळे झाले. माझ्यासाठी अरविंद यांच्याकडून मिळालेले हेच सर्वांत मोठे गिफ्ट आहे. - सुनीता केजरीवाल, पत्नीभाजपला टोलाच्हनुमान मंदिरात जाण्यावरून भाजपने केजरीवाल यांना लक्ष्य केले होते. भाषणाला सुरुवात करताना केजरीवाल यांनी ‘आज मंगलवार है’ असे म्हटताच टाळ्यांचा कडकडाट आणि हास्याचे कारंजे फुलले.च्मी हनुमानाच्या दर्शनासाठी नक्की जाईन. त्यांची दिल्लीकरांवर कृपा झाली आहे. या विजयासाठी त्यांचेही आभार मानणार आहे, असे म्हणून त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.केक कुठे आहे?च्केजरीवाल यांनी कुटुंबीयांचे आभार मानताना ‘आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे’, असे सांगितले.च्तोच गर्दीतून ‘केक कुठे आहे’, असा आवाज आला. त्यावर ‘मी केक खाल्ला, तुम्हालाही मिळेल’, असे म्हणून केजरीवाल यांनी निरोप घेतला.दिल्लीकरांनी दिलेला जनादेश आम्ही स्वीकारला आहे. विधानसभेत चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करू. अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षाचे स्वागत करतो. दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी हे सरकार काम करेल, अशी आशा करतो.- जे.पी. नड्डा, अध्यक्ष, भाजपजनतेसाठी काम करणाºया सरकारला जनतेने पुन्हा संधी दिली आहे. भाजपने घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा फायदा झाला नाही. शिक्षण, आरोग्यासह जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आम्ही काम केले. पुढील पाच वर्षेही अशाच प्रकारे आम्ही काम करू. केजरीवाल हे दिल्लीचे बेटे आहेत, हे दोन कोटी जनतेने दाखवून दिले आहे. ठोस काम आम्ही करुन दाखवू.- मनिष सिसोदिया, उपमुख्यमंत्रीभाजप कार्यकर्त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अतोनात परिश्रम घेतले. प्रदेश अध्यक्ष या नात्याने भाजपच्या कामगिरीची जबाबदारी माझीच आहे. लोकांचा कौल आम्हाला मान्य आहे. आमच्यासाठी हा निकाल अनपेक्षित आहे.- मनोज तिवारी, प्रदेशाध्यक्ष भाजप

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपा