शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

तीन राज्ये, तीन निवडणुका अन् विरोधकांचे तीन आरोप...दिल्लीच्या निकालापूर्वी राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 18:47 IST

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या, म्हणजेच 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते, असे एक्झिट पोल सांगत आहेत. दरम्यान, दिल्ली निकालापूर्वी विरोधकांनी यापूर्वी झालेल्या तीन राज्यांतील निवडणुकांबाबत भाजपवर आरोप करायला सुरुवात केली आहे. आम आदमी पार्टी कालपासून आरोप करत आहे की, त्यांच्या अनेक आमदारांना कोट्यवधी रुपये घेऊन पक्ष बदलण्याची ऑफर देणारे कॉल येत आहेत. या आरोपानंतर एलजी व्हीके सक्सेना यांनी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (एसीबी) च्या चौकशीचे आदेश दिले.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला तीन महिने उलटले असताना राहुल गांधींनी आज पुन्हा पत्रकार परिषदेत बनावट मतदार जोडून निवडणुकांवर प्रभाव टाकल्याचा आरोप केला. दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील मिल्कीपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर समाजवादी पक्ष सातत्याने निवडणूक आयोगाला धारेवर धरत आहे. 

राजकारण तापले दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलचा डेटा येताच आम आदमी पार्टीने भाजपवर 15 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केला. त्यामुळे उपराज्यपालांच्या आदेशानुसार, आज एसीबीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी चौकशीसाठी पोहोचले. पण, अरविंद केजरीवालांची भेट न झाल्यामुळे लाचलुचपतचे पथक नोटीस बजावून माघारी परतले. 

राहुल गांधींचा काय आहे आरोपदुसरीकडे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रातील मागील निवडणुका लढवलेल्या संपूर्ण विरोधकांचे प्रतिनिधित्व करत आहोत. आम्ही मतदार आणि मतदार याद्यांचा अभ्यास केला असून, अनेक अनियमितता आढळल्या आहेत. देशासाठी विशेषत: लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांनी या निष्कर्षांबाबत जागरूक राहून ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर टीका केली आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच महाराष्ट्राच्या मतदार यादीतील गैरप्रकार गंभीर अनियमितता दर्शवितात, असेही म्हटले.

मिल्कीपूर पोटनिवडणूकमिल्कीपूरमध्ये बेईमानी करण्यासाठी भाजपने सर्व प्रकारचे डावपेच अवलंबल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला. मिल्कीपूर पोटनिवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपच्या गुंडांनी अराजकत निर्माण केली, त्यांना पोलिस-प्रशासनाकडून खुलेआम संरक्षण मिळत असल्याचे दिसून आले. पोलीस-प्रशासनाने भाजपच्या गुंडांना मोकळे हात देऊन निवडणूक आचारसंहितेचे घोर उल्लंघन केल्याचा दावा अखिलेश यांनी केला.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपा