शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

तीन राज्ये, तीन निवडणुका अन् विरोधकांचे तीन आरोप...दिल्लीच्या निकालापूर्वी राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 18:47 IST

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या, म्हणजेच 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते, असे एक्झिट पोल सांगत आहेत. दरम्यान, दिल्ली निकालापूर्वी विरोधकांनी यापूर्वी झालेल्या तीन राज्यांतील निवडणुकांबाबत भाजपवर आरोप करायला सुरुवात केली आहे. आम आदमी पार्टी कालपासून आरोप करत आहे की, त्यांच्या अनेक आमदारांना कोट्यवधी रुपये घेऊन पक्ष बदलण्याची ऑफर देणारे कॉल येत आहेत. या आरोपानंतर एलजी व्हीके सक्सेना यांनी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (एसीबी) च्या चौकशीचे आदेश दिले.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला तीन महिने उलटले असताना राहुल गांधींनी आज पुन्हा पत्रकार परिषदेत बनावट मतदार जोडून निवडणुकांवर प्रभाव टाकल्याचा आरोप केला. दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील मिल्कीपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर समाजवादी पक्ष सातत्याने निवडणूक आयोगाला धारेवर धरत आहे. 

राजकारण तापले दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलचा डेटा येताच आम आदमी पार्टीने भाजपवर 15 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केला. त्यामुळे उपराज्यपालांच्या आदेशानुसार, आज एसीबीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी चौकशीसाठी पोहोचले. पण, अरविंद केजरीवालांची भेट न झाल्यामुळे लाचलुचपतचे पथक नोटीस बजावून माघारी परतले. 

राहुल गांधींचा काय आहे आरोपदुसरीकडे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रातील मागील निवडणुका लढवलेल्या संपूर्ण विरोधकांचे प्रतिनिधित्व करत आहोत. आम्ही मतदार आणि मतदार याद्यांचा अभ्यास केला असून, अनेक अनियमितता आढळल्या आहेत. देशासाठी विशेषत: लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांनी या निष्कर्षांबाबत जागरूक राहून ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर टीका केली आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच महाराष्ट्राच्या मतदार यादीतील गैरप्रकार गंभीर अनियमितता दर्शवितात, असेही म्हटले.

मिल्कीपूर पोटनिवडणूकमिल्कीपूरमध्ये बेईमानी करण्यासाठी भाजपने सर्व प्रकारचे डावपेच अवलंबल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला. मिल्कीपूर पोटनिवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपच्या गुंडांनी अराजकत निर्माण केली, त्यांना पोलिस-प्रशासनाकडून खुलेआम संरक्षण मिळत असल्याचे दिसून आले. पोलीस-प्रशासनाने भाजपच्या गुंडांना मोकळे हात देऊन निवडणूक आचारसंहितेचे घोर उल्लंघन केल्याचा दावा अखिलेश यांनी केला.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपा