शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

IASच्या तयारीसाठी गेला होता दिल्लीला, तिसऱ्यांदा बनला आपचा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 14:13 IST

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात पुन्हा एकदा आपनं बाजी मारली आहे.

नवी दिल्लीः देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात पुन्हा एकदा आपनं बाजी मारली आहे. या निवडणुकीत दिल्लीकरांनी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्या 'आम आदमी पार्टी'ला  एकहाती सत्ता दिली. दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी 62 जागांवर आपचा विजय झाला असून, भाजपाला फक्त आठ जागा राखता आल्या आहेत. तर काँग्रेसला या निवडणुकीतही भोपळाही फोडता आलेला नाही. विशेष म्हणजे आपच्या विजयानंतर उत्तर प्रदेशमधल्या संतकबीरनगर जिल्ह्यात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. याचं कारणही खास आहे. खरं तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत संतकबीरनगरमधले मेंहदावलचे रहिवासी अखिलेश त्रिपाठी यांनी लागोपाठ तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. ते मॉडल टाऊन जागेवरून सलग तिसऱ्यांदा आम आदमी पार्टीकडून आमदार झाले आहेत. अखिलेश यांनी आपच्या विरोधात बंडखोरी केलेल्या भाजपाच्या कपिल मिश्रा यांचा 12 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. अखिलेश हे दिल्लीत आयएएसच्या तयारीसाठी आले होते. मुलगा आमदार झाल्याचं समजल्यानंतर कुटुंबीयांसह जिल्ह्यातील लोकांनी आनंद साजरा केला आहे.सेवानिवृत्त झालेले शिक्षक वडील अभयनंदन त्रिपाठी म्हणाले, जो पक्ष देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे, त्या पक्षासोबत माझा मुलगा असल्यानं मी आनंदी आहे. मॉडल टाऊन विधानसभा क्षेत्रातून विजयी झालेले अखिलेश हे आपच्या संस्थापक सदस्य नेत्यांपैकी एक आहेत. ते पहिल्यांदा 2013मध्ये, त्यानंतर 2015मध्ये आणि आता 2020मध्ये आपकडून मॉडल टाऊन जागेवरून निवडणुकीत उतरले आणि विजय झालेले आहेत.प्रत्येक वेळी ते चांगल्या मताधिक्क्यानं निवडून आले आहेत. संतकबीरनगरमधल्या अखिलेश त्रिपाठी यांनी 1998मध्ये शालेय शिक्षण आणि 2000मध्ये इंटरमीडिएटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ईसीसी कॉलेज इलाहाबादमधून 2003मध्ये बीए आणि वर्षं 2005मध्ये प्राचीन इतिहास विषयावर अध्यापन केलं आहे. 2006मध्ये इलाहाबादमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. वर्षं 2007मध्ये दिल्लीत आयएएसची तयारी करण्यासाठी आले होते. दिल्लीत गेल्यानंतर अखिलेश अण्णा हजारेंच्या आंदोलनानं प्रभावित होऊन त्यांच्याशी जोडले गेले. त्याचदरम्यान ते एका सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे अरविंद केजरीवालांसोबत जोडले गेले. आपकडून त्यांना मॉडल टाऊन विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी देण्यात आली आणि जनतेनंही त्यांच्यावर चांगला विश्वास दाखवलेला आहे. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवाल