शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

दहा आठवडे, दहा वाजता फक्त दहा मिनिटे; अरविंद केजरीवालांनी दिलं नरेंद्र मोदींना आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 3:52 PM

दिल्ली सरकारकडून हे अभियान 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात जनजागरण अभियान आणि संपर्क अभियान सुरू करणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता अभियानाची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे दिल्ली सरकार 1 सप्टेंबरपासून नवीन अभियानाची सुरूवात करणार आहे. यामध्ये दिल्लीतील लोकांना दर रविवारी दहा वाजता दहा मिनिटे वेळ काढून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. ज्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे आजार रोखण्यास मदत होईल असा दावा केला आहे. 

दिल्ली सरकारकडून हे अभियान 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानाचं नाव दहा आठवडे, दहा वाजता, दहा मिनिटे असं ठेवण्यात आलं आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान डेंग्यू-चिकनगुनिया सारखे आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. यंदाच्या वर्षी दिल्लीत डेंग्यूचे 75 प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, 2017 मध्ये सर्वात जास्त मृत्यू डेंग्यूमुळे झाले आहेत. मात्र त्यानंतर हा आकडा कमी कमी होत आला. आता या अभियानाच्या माध्यमातून आजारातून होणारे मृत्यू कायमचेच बंद करण्याचे प्रयत्न होणार आहेत असं ते म्हणाले. 

आरोग्य सेवेत सुधारणा2014 मध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 15,867 होती, त्यात घट होऊन ही संख्या 2018 मध्ये 2798 इतकी झाली. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झालेली घट हे आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे. आमचं सरकार आल्यापासून एका वर्षात आरोग्य विभागात सुधारणा केल्या गेल्या. त्यामुळे बजेटमध्ये 14 टक्के वाढ झाली. 

मंगळवारी केजरीवाल सरकारने नागरिकांकडे असलेल्या पाणी बीलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा केली. ज्या नागरिकांच्या घरी फंक्शनल मीटर आहे, त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच, उर्वरीत नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत फंक्शनल मीटर बसवून घेण्याची सवलतही दिल्ली सरकारने दिली आहे. नवीन तंत्रज्ञामुळे जुन्या बिलांसंदर्भातील अनेक अडचणी समोर आल्या आहेत. विना रिडींगही नागरिकांना बील आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली