शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

शाळेत सहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:08 IST

गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

नवी दिल्ली : दिल्लीतील वसंत विहार येथील चिन्मय शाळेत सहावीत शिकणाऱ्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मंगळवारी (३ डिसेंबर) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेप्रकरणी आज मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच दोन पद्धतीचा तपास करण्याचेही आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलीस ज्याप्रकारे घाईघाईने वागत आहेत, त्यावरून ते आरोपींना वाचवत असल्याचा आरोप मुलाचे वडील सागर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वी वसंत विहार येथील शाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. हे संशयास्पद प्रकरण आहे, असे काय घडलं, ज्यामुळं मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला असेल तर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. सीसीटीव्ही उपलब्ध आहेत. आम्ही दोन प्रकारच्या तपासाचे आदेश दिले आहेत. शाळेच्या भूमिकेची शिक्षण विभाग चौकशी करणार आहे. तर विद्यार्थ्याला रुग्णालयात नेण्यात काही विलंब झाला का? हे पाहण्यासाठी एसडीएमकडून दुसरी चौकशी केली जाईल. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री आतिशी यांनी सांगितले.

याचबरोबर, असे काय घडत आहे की, सहावीच्या वर्गातील मुले एवढ्या हिंसकपणे मारामारी करत आहेत? याची चौकशी करावी लागेल, त्यासाठी दिल्लीतील सर्वांना एकत्र यावे लागेल. आज मुलं रोज हिंसाचाराच्या बातम्या पाहत आहेत. संपूर्ण समाजात गुन्ह्यांच्या बातम्या येत आहेत. याचा परिणाम मुलांवर होत आहे, असेही मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या.

पोलीस आरोपींना वाचवत आहेत - वडिलांचा आरोपयाप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केला आहे. ते म्हणाले की, शाळा आणि पाच मुलांना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत, असा आम्हाला संशय आहे. मुलं त्याचा गळा दाबत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. १०-११ वीच्या एका मुलानं येऊन त्याचा गळा आवळून खून केला होता. तसेच, त्या दिवशीही पोलिसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार घाईघाईने करण्यास सांगितले. यासाठी काल सकाळी पोलिसांनी घाईघाईने बळाचा वापर केला आणि लाठीचार्जही झाला.

टॅग्स :Atishiआतिशीdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSchoolशाळाStudentविद्यार्थी