शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दिल्लीत भाजप सरकार आलं तर काय-काय मिळणार? अमित शाह यांनी 'संकल्प पत्र पार्ट-3' जारी करत सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 18:17 IST

यात भाजपने यमुना नदी स्वच्छ करण्याचे, अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क देण्याचे, कामगारांसाठी जीवन विमा आणि तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक मैदानात उतरलेले सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ-मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. यातच आज (शनिवारी) केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी भाजपचे संकल्प पत्र -३ सादर केले. यात भाजपने यमुना नदी स्वच्छ करण्याचे, अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क देण्याचे, कामगारांसाठी जीवन विमा आणि तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेली अमित शाह म्हणाले, "आज मी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या संकल्पाचा शेवटचा भाग प्रसिद्ध करत आहे. या ठिकाणी मी कोणत्याही पक्षाचे नाव घेणार नाही. मात्र, आम्ही जी आश्वासने देतो, ती पूर्ण करतो. अनेकांनी दिलेल्या सूचनांनुसार, हे संकल्प पत्र तयार करण्यात आले आहे." यासंदर्भात सविस्तर बोलताना शाह म्हणाले, "जर भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला, तर १७०० अनधिकृत वसाहतींना संपूर्ण मालकी हक्क दिला जाईल. दिल्लीमध्ये १३००० दुकाने सील आहेत, ती ६ महिन्यांच्या आत पुन्हा खुली केली जातील. निर्वासित वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जमिनींना मालकी हक्क दिले जातील."

अमित शाह पुढे म्हणाले, "दिल्लीमध्ये भव्य महाभारत कॉरिडोर विकसित केला जाईल. मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधी आणि वकिलांना १० लाख रुपयांपर्यंत जीवन विमा आणि १० लाख रुपयांपर्यंत आरोग्य आणि अपघात विमाही दिला जाईल."

यमुना रिव्हरफ्रंट तयार करणार - अमित शहा म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर, आपण साबरमती रिव्हर फ्रंटप्रमाणेच यमुना रिव्हर फ्रंट तयार करणार आहोत. हे काम तीन वर्षांत पूर्ण होईल. अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना शाह म्हणाले, "केजरीवाल म्हणाले होते की ते ७ वर्षांत यमुना पूर्णपणे स्वच्छ करतील आणि दिल्लीतील लोकांसमोर यमुनेत डुबकी मारतील. मी केजरीवालजींना आठवण करून देऊ इच्छितो की केजरीवालजी, लोक आपल्या जगप्रसिद्ध डुबकीची वाट बघत आहेत.

अमित शाह पुढे म्हणाले, "आम्ही तीन वर्षांत यमुना नदी स्वच्छ करणार आणि साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर एक रिव्हरफ्रंट विकसित करणार. मी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबाला तीन वर्षांनंतर, यमुनेत डुबकी मारण्यासाठी आमंत्रित करतो"

तरुणांसाठी नोकऱ्या आणि वाहतूक क्षेत्रात गुंतवणूक -भाजपने ५० हजार तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासनही दिले आहे. याच बोरबर, १३००० बसेस ई-बसमध्ये रूपांतरित केल्या जातील. २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकात्मिक सार्वजनिक वाहतूक नेटवर्क, दिल्ली १००% ई-बस शहर बनेल, मेट्रो फेज ४ चे काम लवकरच पूर्ण होईल, मेट्रो आणि बसेस २४x७ उपलब्ध असतील. याशिवाय, टेक्सटाइल वर्कर्सना १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Amit Shahअमित शाहBJPभाजपा