शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत भाजप सरकार आलं तर काय-काय मिळणार? अमित शाह यांनी 'संकल्प पत्र पार्ट-3' जारी करत सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 18:17 IST

यात भाजपने यमुना नदी स्वच्छ करण्याचे, अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क देण्याचे, कामगारांसाठी जीवन विमा आणि तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक मैदानात उतरलेले सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ-मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. यातच आज (शनिवारी) केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी भाजपचे संकल्प पत्र -३ सादर केले. यात भाजपने यमुना नदी स्वच्छ करण्याचे, अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क देण्याचे, कामगारांसाठी जीवन विमा आणि तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेली अमित शाह म्हणाले, "आज मी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या संकल्पाचा शेवटचा भाग प्रसिद्ध करत आहे. या ठिकाणी मी कोणत्याही पक्षाचे नाव घेणार नाही. मात्र, आम्ही जी आश्वासने देतो, ती पूर्ण करतो. अनेकांनी दिलेल्या सूचनांनुसार, हे संकल्प पत्र तयार करण्यात आले आहे." यासंदर्भात सविस्तर बोलताना शाह म्हणाले, "जर भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला, तर १७०० अनधिकृत वसाहतींना संपूर्ण मालकी हक्क दिला जाईल. दिल्लीमध्ये १३००० दुकाने सील आहेत, ती ६ महिन्यांच्या आत पुन्हा खुली केली जातील. निर्वासित वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जमिनींना मालकी हक्क दिले जातील."

अमित शाह पुढे म्हणाले, "दिल्लीमध्ये भव्य महाभारत कॉरिडोर विकसित केला जाईल. मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधी आणि वकिलांना १० लाख रुपयांपर्यंत जीवन विमा आणि १० लाख रुपयांपर्यंत आरोग्य आणि अपघात विमाही दिला जाईल."

यमुना रिव्हरफ्रंट तयार करणार - अमित शहा म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर, आपण साबरमती रिव्हर फ्रंटप्रमाणेच यमुना रिव्हर फ्रंट तयार करणार आहोत. हे काम तीन वर्षांत पूर्ण होईल. अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना शाह म्हणाले, "केजरीवाल म्हणाले होते की ते ७ वर्षांत यमुना पूर्णपणे स्वच्छ करतील आणि दिल्लीतील लोकांसमोर यमुनेत डुबकी मारतील. मी केजरीवालजींना आठवण करून देऊ इच्छितो की केजरीवालजी, लोक आपल्या जगप्रसिद्ध डुबकीची वाट बघत आहेत.

अमित शाह पुढे म्हणाले, "आम्ही तीन वर्षांत यमुना नदी स्वच्छ करणार आणि साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर एक रिव्हरफ्रंट विकसित करणार. मी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबाला तीन वर्षांनंतर, यमुनेत डुबकी मारण्यासाठी आमंत्रित करतो"

तरुणांसाठी नोकऱ्या आणि वाहतूक क्षेत्रात गुंतवणूक -भाजपने ५० हजार तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासनही दिले आहे. याच बोरबर, १३००० बसेस ई-बसमध्ये रूपांतरित केल्या जातील. २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकात्मिक सार्वजनिक वाहतूक नेटवर्क, दिल्ली १००% ई-बस शहर बनेल, मेट्रो फेज ४ चे काम लवकरच पूर्ण होईल, मेट्रो आणि बसेस २४x७ उपलब्ध असतील. याशिवाय, टेक्सटाइल वर्कर्सना १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Amit Shahअमित शाहBJPभाजपा