शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

५००, २०००रुपयांच्या नोटांवरून गांधीजींचा फोटो हटवा, तिथे तुमचा फोटो लावा, काँग्रेसच्या आमदाराने Narendra Modiकडे केली मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 7:06 PM

Rs 500, 2000 notes: ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवरून Mahatma Gandhiचा फोटो हटवण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार Bharat Singh यांनी पंतप्रधान Narendra Modiकडे केली आहे.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने नोटांची महात्मा गांधी सिरीज सुरू केल्यापासून सर्व नोटांवर महात्मा गांधीचा फोटो छापला जात आहे. दरम्यान, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो हटवण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या एका आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार भरत सिंह कुंदनपूर यांनी मोदींना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ५०० आणि २००० च्या नोटांवरील गांधीजींचा फोटो हटवून त्या ठिकाणी मोदींनी स्वत:चा फोटो लावावा, आणि त्याखाली न खाऊंगा, न खाने दुंगा हा संदेश लिहावा, असा सल्लाही काँग्रेसच्या या आमदाराने दिला आहे. (Delete Mahatma Gandhiji's photo from Rs 500, 2000 notes, put your photo there, Congress MLA Bharat Singh demands Narendra Modi)

याबाबत मोदींना लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले की, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवर छापलेले मोदींचे चित्र हटवण्यात यावे, अशी माझी मागणी आहे. कारण या नोटांचा वापर भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले लोक लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे गांधीजींचा अपमान होतो, असे ते म्हणाले.

दरम्यान, ५०० आणि २००० हजार रुपयांच्या नोटांवर मोदींनी स्वत:चा फोटो लावावा, आणि त्याखाली न खाऊंगा, न खाने दुंगा हा संदेश लिहावा, असा सल्लाही भरत सिंह कुंदनपूर यांनी या पत्रातून दिला. ते म्हणाले की, असे केल्याने भ्रष्टाचार थांबेल. भ्रष्टाचारी नोटा घ्यायला घाबरतील. भ्रष्टाचाऱ्यांमध्ये मोदींनी दिलेल्या इशाऱ्याची भीती असेल. ते चमकतील. कारण मोदींना नोटाबंदीचा पुरेपूर अभ्यास आहे.

गेल्या साडेसात दशकांमध्ये देश आणि समाजात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी एसीबी विभाग आहे. तो आपले काम करत आहे. राजस्थानमध्ये जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२० या काळात ६१६ ट्रॅप पकडण्यात आले. म्हणजेच राज्यात दररोज सरासरी दोन ट्रॅप लावण्यात आले. ही रक्कम रोख स्वरूपात घेतली जाते. यासाठी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा वापरल्या जातात. त्यावर गांधीजींचं चित्र असतं. त्यामुळे गांधीजींचा अपमान होतो. त्यामुळे गांधीचींचा फोटो हा ५, १०, २०, ५०, १०० आणि २०० रुपयांच्या नोटांवर छापला जावा. या नोटा गरीबांना उपयोगी पडतात. तसेच गांधीजींनीही गरिबांसाठी काम केले होते, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण