शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

२०१४ पेक्षा अधिक जागा मिळविण्याचा निर्धार, अजेय भाजपाचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 04:12 IST

भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांना सोबत घेत २०१४ पेक्षा अधिक बहुमताने सरकार स्थापन करण्याचा संकल्प केला आहे.

नवी दिल्ली : भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांना सोबत घेत २०१४ पेक्षा अधिक बहुमताने सरकार स्थापन करण्याचा संकल्प केला आहे. सूत्रांनी सांगितले की, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा संकल्प करण्यात आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत ‘अजेय भाजप’चा नारा देण्यात आला.सूत्रांनी सांगितले की, या वर्षीच्या अखेरीस मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा संकल्प करण्यात आला. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, २०१९ च्या निवडणुकीत विजयी होण्याचा भाजपला पूर्ण विश्वास आहे. विशेष म्हणजे २०१४ मधील निवडणुकीपेक्षाही अधिक बहुमत मिळवून विजय संपादन करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला. यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे.२०१४ मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निवडणुका लढविल्या होत्या आणि त्यात पक्षाला घवघवीत यश मिळाले. चार वर्षात सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात नोटाबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी हे निर्णय महत्वाचे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जगभरात अनेक देशात दौरे करुन भारतात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव देऊन शेतकºयांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केलेली आहे.

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी