शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

सनातनला विरोध करणाऱ्यांना मृत्युदंड अन्...! धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू राष्ट्राच्या प्लॅमध्ये काय-काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:57 IST

धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, दुबई आणि यूएईमध्ये ज्या पद्धतीने कायदे आहेत, तेथे मुस्लीम धर्माला प्राधान्य दिले जाते. त्याच पद्धतीने, हिंदू राष्ट्रात सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचे आणि संस्कृतीचे पालन करण्याचा अधिकार असेल. पण, प्राधान्य सनातनींनाच असेल.

बागेश्वर धाम पीठाधीश्वर आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे हिंदू राष्ट्राच्या मोहिमेसंदर्भात सातत्याने बोलत असतात. त्यांचा दरबार जेथे जेथे लागतो तेथे-तेथे ते हिंदू राष्ट्रासंदर्भात आपले विचार व्यक्त करतात. गेल्या तीन दिवसांपासून ते उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हनुमान कथेचे वाचन करत आहेत. दरम्यान त्यांनी, जेव्हा देश हिंदू राष्ट्र होईल, तेव्हा काय होईल? यासंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले, भारत हिंदू राष्ट्र झाल्यानंतर, सनातन धर्माविरोधात बोलणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असेल. दंड प्रक्रिया बदलेल आणि फाशीची शिक्षा होईल. प्रत्येकाला हिंदू राष्ट्रात राहण्याचा अधिकार असेल, मात्र ज्याप्रमाणे मुस्लीम देशांमध्ये मुस्लीम धर्माच्या अनुयायांना प्राधान्य दिले जाते, त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्रात सनातन समाजाला प्राधान्य असेल. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा असेल.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, "देश संविधान, हनुमान आणि सनातन यांच्या माध्यमाने चालवला जाईल. केवळ सनातन धर्मच आपल्याला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवू शकतो. देशाचे विभाजन करू इच्छिणाऱ्यांपासून आपण सावध रहायला हवे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळेल. हिंदू राष्ट्रात जातीभेदावर राजकारण होणार नाही. हिंदू राष्ट्र झाल्यानंतर कोणीही हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. 

धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, दुबई आणि यूएईमध्ये ज्या पद्धतीने कायदे आहेत, तेथे मुस्लीम धर्माला प्राधान्य दिले जाते. त्याच पद्धतीने, हिंदू राष्ट्रात सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचे आणि संस्कृतीचे पालन करण्याचा अधिकार असेल. पण, प्राधान्य सनातनींनाच असेल. यावेळी त्यांनी, हिंदू राष्ट्रासाठी दिल्ली ते वृंदावन, अशी पदयात्रा काढण्याची घोषणाही केली.

हिंदूंना जागृत करण्यासाठी आपण दिल्ली ते वृंदावन, अशी दुसरी यात्रा काढू. सरकार घोषणा देते, 'बच्चे दो अच्छे' मग 'चच्ची के 30 बच्चे क्यों?' असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. एवढेच नाही तर, हिंदूंच्या मुलांची क्वांटिटी कमी असली तरी, ते त्यांची क्वालिटी चांगली असावी. मुले चारच असावीत पण कट्टर हिंदू असावीत. मानवांत मानवता यावी, यासाठी क्रांती घडवू, असेही धीरेंद्र शासंत्री म्हणाले.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामHindutvaहिंदुत्वHinduहिंदूHinduismहिंदुइझम