शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

मृत शेतकऱ्याला शहीद घोषित, पार्थिव शरीरावर तिरंगा गुंडाळल्यानं वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 11:26 IST

रामचंद्र यांचा मृतदेह ज्यावेळी गर्दीत ठेवण्यात आला, त्यावेळी एक शेतकरी नेता भाषण देत होता. त्यावेळी, भाषण मध्येच थांबवत रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहून 1 मिनिटांचे मौन धारण करण्यात आले.

ठळक मुद्देरामचंद्र यांचा मृतदेह ज्यावेळी गर्दीत ठेवण्यात आला, त्यावेळी एक शेतकरी नेता भाषण देत होता. त्यावेळी, भाषण मध्येच थांबवत रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहून 1 मिनिटांचे मौन धारण करण्यात आले.

चंढीगड - हरियाणातील हिसारमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यात, आता येथील शेतकऱ्यांवर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप लावला जात आहे. 69 वर्षीय शेतकरी रामचंद्र खरब यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयात नेण्याऐवजी आंदोलनस्थळावर या शेतकऱ्याला नेले. तेथेच शेतकऱ्याने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर, या शेतकऱ्याला आंदोलनकर्त्यांनी शहीद दर्जा दिल्याचा आरोप लावण्यात येत आहे. 

रामचंद्र यांचा मृतदेह ज्यावेळी गर्दीत ठेवण्यात आला, त्यावेळी एक शेतकरी नेता भाषण देत होता. त्यावेळी, भाषण मध्येच थांबवत रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहून 1 मिनिटांचे मौन धारण करण्यात आले. त्यानंतर, मृत शेतकरी रामचंद्र यांना शहीद घोषित करण्यात आले. त्यानंतर, त्यांचे पार्थीव तिरंग्यात लपटण्यात आले. उगलान येथील रहिवाशी असलेल्या रामचंद्र हे कारमधून हिसारसाठी निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला अन् तेथेच त्यांचा मृत्यू झाला. 

रामचंद्र हे भारतीय किसान युनियनचे सदस्य असून 1 आठवड्यापूर्वीच ते दिल्लीच्या टिकरी बॉर्डरवरुन परतले होते. जवळपास 15 दिवस ते दिल्लीच्या आंदोलनस्थळी उपस्थित होते. रामचंद्र यांना 4 मुली आणि 2 मुले आहेत. रामचंद्र यांचा मृतदेह गर्दीत ठेवला असतानाही एकाही व्यक्तीच्या तोंडावर मास्क लावल्याचे दिसून आले नाही. 16 मे रोजी 350 शेतकऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांविरुद्ध प्रदर्शन करण्यासाठी हे सर्वच शेतकरी एकत्र जमले होते. या आंदोलनकर्त्यांकडून दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या जवळपास 400 शेतकऱ्यांना शहीद असल्याचं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीHaryanaहरयाणाDeathमृत्यूPoliceपोलिस