शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

ईदच्या दिवशी काश्मीर अशांत, सुरक्षा दलांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 06:35 IST

रमजान ईदच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, पाकिस्तानने सणाच्या दिवशीच सीमेवर केलेल्या गोळीबारात बिकास गुरुंग नावाचा जवान शहीद झाला आहे.

श्रीनगर : रमजान ईदच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, पाकिस्तानने सणाच्या दिवशीच सीमेवर केलेल्या गोळीबारात बिकास गुरुंग नावाचा जवान शहीद झाला आहे. ईदचा नमाज अदा करून झाल्यानंतर, राजधानी श्रीनगरसह अनंतनाग, तसेच अनेक शहरांमध्ये जमावाने दगडफेक सुरू केली. त्यात सुरक्षा दलाचे जवान गंभीर जखमी झाले आहेत.शिवाय श्रीनगर व अन्य शहरांत जमावाकडून इसिसचे झेंडे फडकावण्यात आले. तरुणांनी चेहºयांना रुमाल बांधले होते, पण त्यात लहान मुलांनाही सहभागी करून घेतले होते. या वेळी प्रथमच इतकी लहान मुले यात सहभागी झाली होती. श्रीनगर शहराबाहेर सीआरपीएफच्या पथकावरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात दिनेश पासवान हा जवान गंभीर जखमी झाला असून, त्याला लष्कराच्या बदामी बागच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.>नौशेरा, अरनियातपाकचा गोळीबारनौशेरा सेक्टरमध्येनियंत्रण रेषेजवळ पाकच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. अरनिया सेक्टरमध्येही पहाटे४ वाजता पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्याला बीएसएफनेही चोख प्रत्युत्तर दिले.>यंदा वाघा बॉर्डरवर मिठाई वाटप नाहीअमृतसर : भारत व पाक यांच्यातील अतिशय तणावाच्या संबंधांमुळे ईदचा दिवस असूनही पंजाबच्या वाघा बॉर्डरवर दोन्ही देशांच्या जवानांनी एकमेकांना मिठाई दिली नाही. दरवर्षी दोन्ही देशाचे सैनिक मिठाई वाटून ईद साजरी करीत असतात.>अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याकाश्मीरच्या अनंतनागमध्ये ईदनिमित्त नमाज अदा केल्यानंतर,काही लोकांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर जोरदार दगडफेक केली. दगडफेक करणाºयांच्या हातात पाकिस्तान व इसिसचे झेंडे होते.हा जमाव पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होता.दगडफेक सुरू झाल्याने सुरक्षा दलाच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक सुरूच राहिल्याने जवानांनी हवेत गोळीबार केला. तिथे त्या वेळी ग्रेनेड फेकला गेला. त्यात एक तरुण ठार झाला. तेव्हापासून दिवसभर अनंतनागमध्ये तणाव होता. श्रीनगरमध्येही नमाज अदा केल्यानंतर जमावाने जोरदार दगडफेक केला.>जवानाच्या वडिलांचा इशारामाझ्या मुलाच्या मारेकºयांना ७२ तासांत ठार करा अन्यथाआपण स्वत:च मुलाच्या हत्येचा सूड घेऊ , असे शहीद जवान औरंगजेब यांच्या वडिलांनी सुरक्षा दले व पोलिसांना सांगितलेआहे. औरंगजेबचे वडील म्हणाले की, माझ्या मुलाला मारणाºया दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करायला सरकारला कोणी थांबविले आहे की काय? तीन दिवसांत त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मी स्वत:च बदला घेईन.औरंगजेब यांचे वडील व काकाही सैन्यात होते. औरंगजेब यांच्या काकाला वीरमरण आले होते. औरंगजेब यांचा भाऊसुद्धा सैन्यात आहेत. मुलाच्या मृत्यूनंतर काही राजकीय नेत्यांनी जे राजकारण सुरू केले आहे, त्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर