शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मुली कायम मुली, मुलगा लग्नापर्यंतच मुलगा; वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेस फ्लॅट सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 10:16 IST

९० वर्षांचे विनोद दलाल व ८९ वर्षे वयाच्या त्यांच्या पत्नी जुहू रोड मुंबई येथे फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना दोन विवाहित मुली व एक मुलगा आहे. त्यांनी आपला स्वत:चा राहता फ्लॅट मुलींना भेट म्हणून देऊन टाकला. मुलगा आशिष व त्याच्या पत्नीला हे आवडले नाही व त्यांनी फ्लॅट बळकाविण्यासाठी वृद्ध आई- वडिलांना त्रास देण्यास सुरुवात केली.

डॉ. खुशालचंद बाहेती -मुंबई: ज्येष्ठ नागरिक कायद्याप्रमाणे मुले आणि नातेवाईकांवर वृद्धांना कोणत्याही त्रासाविना सामान्य जीवन जगण्यासाठी असणाऱ्या गरजा पुरविण्याची जबाबदारी आहे. हा कायदा करण्यामागचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे आहे, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने आई, वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा व सुनेला घर सोडण्याचा आदेश दिला.९० वर्षांचे विनोद दलाल व ८९ वर्षे वयाच्या त्यांच्या पत्नी जुहू रोड मुंबई येथे फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना दोन विवाहित मुली व एक मुलगा आहे. त्यांनी आपला स्वत:चा राहता फ्लॅट मुलींना भेट म्हणून देऊन टाकला. मुलगा आशिष व त्याच्या पत्नीला हे आवडले नाही व त्यांनी फ्लॅट बळकाविण्यासाठी वृद्ध आई- वडिलांना त्रास देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे आशिषकडे स्वत:चा फ्लॅट व इतर मालमत्ता आहे. मुलगा व सुनेच्या त्रासाला कंटाळून त्यांनी ज्येष्ठ नागरिक संरक्षण प्राधिकरणाकडे अर्ज करून त्यांना घरातून काढून टाकण्याची मागणी केली. प्राधिकरणाने अर्ज मान्य करत मुलास कुटुंबासह फ्लॅट सोडण्याचे आदेश दिले.याविरुद्ध मुलाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. अपिलात फ्लॅट मुलींना भेट दिला असल्याने आई वडिलांचा यावर हक्क राहिलेला नाही म्हणून प्राधिकरणाच्या आदेशावर आक्षेप घेतला. हे फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने यात आई-वडिलांचा हक्क मान्य केला, असहाय वृद्ध आई-वडील आयुष्याच्या शेवटच्या काळात शांततेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या किमान अपेक्षाही सधन मुलाकडून पूर्ण होऊ नयेत काय? हे दु:खद आहे. वृद्ध आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या घरात राहणे हेच त्रास देणे आहे. यामुळे त्यांच्या सामान्य जीवन जगण्याच्या अधिकारांवर गदा येते, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने सून व मुलास फ्लॅट सोडण्याचे आदेश दिले.

न्यायालयाचे मत- या कायद्याची अंमलबजावणी करताना न्यायालये संकुचित किंवा पाण्डित्याची भूमिका घेऊ शकत नाहीत.- सामान्य जीवन जगणे याचा अर्थ व्यापक आहे. त्याचा संबंध ज्येष्ठ नागरिकांसाठी घटनेच्या खंड २१ मधील मुलभूत अधिकाराशी आहे.- या कायद्यात मालमत्ता म्हणजे चल, अचल, वडिलोपार्जित किंवा स्वत: मिळवलेली, मूर्त किंवा अमूर्त या सर्वांचा समावेश होतो.फ्लॅट भेटीत मिळूनही मुलींना आई-वडिलांनी शेवटपर्यंत त्यात राहण्यास हरकत नाही. याउलट मुलगा व सून तो बळकावण्यासाठी त्रास देत आहेत. हे पाहून मुली शेवटपर्यंत मुलीच असतात. मुलगा मात्र लग्न होईपर्यंत मुलगा असतो या म्हणण्यात तथ्य असावे. अर्थात याला अपवाद आहेतच. -न्या. जी. एस. कुलकर्णी 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयMumbaiमुंबई