शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

२४ दलितांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, आता ४४ वर्षांनंतर कोर्टाने तीन आरोपींना सुनावली फाशीची शिक्षा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 19:16 IST

Dalit Massacre in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद येथील दिहूली येथे झालेल्या २४ दलितांच्या हत्याकांडाप्रकरणी कोर्टाने तब्बल ४४ वर्षांनंतर निकाल सुनावला आहे. कोर्टाने या प्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद येथील दिहूली येथे झालेल्या २४ दलितांच्या हत्याकांडाप्रकरणी कोर्टाने तब्बल ४४ वर्षांनंतर निकाल सुनावला आहे. कोर्टाने या प्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर एकाला फरार घोषित केले आहे. या प्रकरणातील एकू १७ आरोपींपैकी १३ आरोपींचा आधीच मृत्यू झाला आहे. 

१९८१ मध्ये उत्तर प्रदेशमधील फिरोझाबादजवळील दिहुली येथे दरोडेखोरांच्या टोळीने एका गावावर हल्ला केला होता. तसेच दलित व्यक्तींवर बेछूट गोळीबार करून २४ जणांची हत्या केली होती. तर इतर अनेक जण जशमी झाले होते.या घटनेचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटले होते. तसेच उत्तर प्रदेशपासून केंद्रापर्यंतच्या सरकारांना हादरे बसले होते. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिहुली गावाचा दौरा करून पीडितांची भेट घेतली होती. तेव्हा या हत्याकांडावरून विरोधी पक्षांनी इंदिरा गांधी यांना धारेवर धरलं होतं. तसेच विरोधी पक्षांचे नेते बाबू जगजीवनराम यांनीही या गावाचा दौरा केला होता. 

याबाबतच्या अधिक माहितीनुसार दिहुली हा गावा फिरोजाबाद जिल्ह्यातील जसराना तालुक्यात आहे. येथे डाकू संतोष आणि राधे यांच्या टोळीने १८ नोव्हेंबर १९८१ रोजी दलितांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. जवळपास ४४ वर्षांपासून या घटनेतील पीडित न्यायाच्या प्रतीक्षेत होते. अखेर आज कोर्टाने या प्रकरणात तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र या प्रकरणातील एकूण १७ आरोपींपैकी १३ आरोपींचा आधीच मृत्यू झालेला आहे. तर एक जण फरार आहे.  

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश