शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

२४ दलितांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, आता ४४ वर्षांनंतर कोर्टाने तीन आरोपींना सुनावली फाशीची शिक्षा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 19:16 IST

Dalit Massacre in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद येथील दिहूली येथे झालेल्या २४ दलितांच्या हत्याकांडाप्रकरणी कोर्टाने तब्बल ४४ वर्षांनंतर निकाल सुनावला आहे. कोर्टाने या प्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद येथील दिहूली येथे झालेल्या २४ दलितांच्या हत्याकांडाप्रकरणी कोर्टाने तब्बल ४४ वर्षांनंतर निकाल सुनावला आहे. कोर्टाने या प्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर एकाला फरार घोषित केले आहे. या प्रकरणातील एकू १७ आरोपींपैकी १३ आरोपींचा आधीच मृत्यू झाला आहे. 

१९८१ मध्ये उत्तर प्रदेशमधील फिरोझाबादजवळील दिहुली येथे दरोडेखोरांच्या टोळीने एका गावावर हल्ला केला होता. तसेच दलित व्यक्तींवर बेछूट गोळीबार करून २४ जणांची हत्या केली होती. तर इतर अनेक जण जशमी झाले होते.या घटनेचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटले होते. तसेच उत्तर प्रदेशपासून केंद्रापर्यंतच्या सरकारांना हादरे बसले होते. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिहुली गावाचा दौरा करून पीडितांची भेट घेतली होती. तेव्हा या हत्याकांडावरून विरोधी पक्षांनी इंदिरा गांधी यांना धारेवर धरलं होतं. तसेच विरोधी पक्षांचे नेते बाबू जगजीवनराम यांनीही या गावाचा दौरा केला होता. 

याबाबतच्या अधिक माहितीनुसार दिहुली हा गावा फिरोजाबाद जिल्ह्यातील जसराना तालुक्यात आहे. येथे डाकू संतोष आणि राधे यांच्या टोळीने १८ नोव्हेंबर १९८१ रोजी दलितांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. जवळपास ४४ वर्षांपासून या घटनेतील पीडित न्यायाच्या प्रतीक्षेत होते. अखेर आज कोर्टाने या प्रकरणात तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र या प्रकरणातील एकूण १७ आरोपींपैकी १३ आरोपींचा आधीच मृत्यू झालेला आहे. तर एक जण फरार आहे.  

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश