शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

भाजीपाला लागवड ठरली शेतकऱ्यांना फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:28 IST

नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी बारमाही भाजीपाला पिके करतात. त्यामुळे रोजच्या रोज घरखर्चासाठी रोख पैसा मिळतो. या भागात दक्षिणेला दारणा व उत्तरेला गोदावरी नदी असल्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी टमाटे, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, भेंडी, गवार, कारले, गिलके, दोडके, भोपळा, कोथिंबीर हा नगदी भाजीपाला बारमाही घेतात.

ठळक मुद्देनगदी पिकांकडे कल : पूर्वभागात टमाटे लागवडीच्या क्षेत्रात वाढ

एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी बारमाही भाजीपाला पिके करतात. त्यामुळे रोजच्या रोज घरखर्चासाठी रोख पैसा मिळतो. या भागात दक्षिणेला दारणा व उत्तरेला गोदावरी नदी असल्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी टमाटे, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, भेंडी, गवार, कारले, गिलके, दोडके, भोपळा, कोथिंबीर हा नगदी भाजीपाला बारमाही घेतात.एकलहरे परिसरातील सामनगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदगिरी, जाखोरी, हिंगणवेढे या परिसरात टमाट्यचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वावरात सºया करून, मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन पसरून, त्यावर होल पाडून नर्सरीतून आणलेली टमाटा रोपे लावली जातात. या भागात खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात टमाट्याची लागवड केली जाते. टमाट्याची पुसा रु बी, भाग्यश्री, वैशाली, रूपाली आदी प्रकारचे वाणलागवड केली जाते. एकरी सहा ते सात हजार रोपे लागवड होते. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी बुरशी नाशक फवारणी केली जाते. ६० ते ६५ दिवसांनी पहिली तोडणी सुरू होते. एका झाडाला सुमारे २० ते २५ किलो शेतमाल निघतो. सायखेडा, नाशिक, पिंपळगाव मार्केटला अथवा थेट कंपनीला माल विकला जातो, असे येथील शेतकरी पप्पू जगताप यांनी सांगितले.या भागातील बहुतांश शेतकरी रोखीचे पीक म्हणून भेंडीची लागवड करतात. वावरात नांगरटी करून सºया तयार करून भेंडीच्या एकेक बियांची टोचन पद्धतीने लागवड केली जाते. सामनगाव, कोटमगाव शिवारात भेंडी लागवड मोठ्या प्रमाणात होते. राधिका, कावेरी, लावण्या, ताज या प्रकारचे भेंडीचे वाण लावले जातात. वेळेवर कीडनाशक फवारणी करून चांगली निगा राखली, तर सुमारे दीड महिन्यानंतर फुलकळी लागते, तर दोन महिन्यांत खुडणी सुरू होते. एका क्रे टमध्ये साधारण दहा किलो भेंडी बसते. २५० ते ३०० रु पये प्रमाणे क्रे टची विक्र ी होते. येथील शेतकरी नाशिकरोड स्थानिक भाजी बाजारात भेंडीची विक्र ी करतात. त्यामुळे रोख पैसा हातात मिळत असल्याने घरगुती किराणा, दैनंदिन गरजा भागवण्यास हातभार लागतो, असे सामनगावचे शेतकरी तानाजी जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी