शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

भाजीपाला लागवड ठरली शेतकऱ्यांना फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:28 IST

नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी बारमाही भाजीपाला पिके करतात. त्यामुळे रोजच्या रोज घरखर्चासाठी रोख पैसा मिळतो. या भागात दक्षिणेला दारणा व उत्तरेला गोदावरी नदी असल्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी टमाटे, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, भेंडी, गवार, कारले, गिलके, दोडके, भोपळा, कोथिंबीर हा नगदी भाजीपाला बारमाही घेतात.

ठळक मुद्देनगदी पिकांकडे कल : पूर्वभागात टमाटे लागवडीच्या क्षेत्रात वाढ

एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी बारमाही भाजीपाला पिके करतात. त्यामुळे रोजच्या रोज घरखर्चासाठी रोख पैसा मिळतो. या भागात दक्षिणेला दारणा व उत्तरेला गोदावरी नदी असल्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी टमाटे, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, भेंडी, गवार, कारले, गिलके, दोडके, भोपळा, कोथिंबीर हा नगदी भाजीपाला बारमाही घेतात.एकलहरे परिसरातील सामनगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदगिरी, जाखोरी, हिंगणवेढे या परिसरात टमाट्यचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वावरात सºया करून, मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन पसरून, त्यावर होल पाडून नर्सरीतून आणलेली टमाटा रोपे लावली जातात. या भागात खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात टमाट्याची लागवड केली जाते. टमाट्याची पुसा रु बी, भाग्यश्री, वैशाली, रूपाली आदी प्रकारचे वाणलागवड केली जाते. एकरी सहा ते सात हजार रोपे लागवड होते. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी बुरशी नाशक फवारणी केली जाते. ६० ते ६५ दिवसांनी पहिली तोडणी सुरू होते. एका झाडाला सुमारे २० ते २५ किलो शेतमाल निघतो. सायखेडा, नाशिक, पिंपळगाव मार्केटला अथवा थेट कंपनीला माल विकला जातो, असे येथील शेतकरी पप्पू जगताप यांनी सांगितले.या भागातील बहुतांश शेतकरी रोखीचे पीक म्हणून भेंडीची लागवड करतात. वावरात नांगरटी करून सºया तयार करून भेंडीच्या एकेक बियांची टोचन पद्धतीने लागवड केली जाते. सामनगाव, कोटमगाव शिवारात भेंडी लागवड मोठ्या प्रमाणात होते. राधिका, कावेरी, लावण्या, ताज या प्रकारचे भेंडीचे वाण लावले जातात. वेळेवर कीडनाशक फवारणी करून चांगली निगा राखली, तर सुमारे दीड महिन्यानंतर फुलकळी लागते, तर दोन महिन्यांत खुडणी सुरू होते. एका क्रे टमध्ये साधारण दहा किलो भेंडी बसते. २५० ते ३०० रु पये प्रमाणे क्रे टची विक्र ी होते. येथील शेतकरी नाशिकरोड स्थानिक भाजी बाजारात भेंडीची विक्र ी करतात. त्यामुळे रोख पैसा हातात मिळत असल्याने घरगुती किराणा, दैनंदिन गरजा भागवण्यास हातभार लागतो, असे सामनगावचे शेतकरी तानाजी जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी