CRPF Jawan Pakistan Spy: भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात एनआयएसह सर्व तपास यंत्रणांनी शोध मोहिमा सुरू केल्या आहेत. यादरम्यान, युट्यूबर ज्योती मल्होत्रासह अनेक हेरांना ताब्यात घेण्यात आले आहे. अलीकडेच सीआरपीएफच्या एका जवानालादेखील हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत, सैन्य किंवा सुरक्षा दलांमधील जवानांनी हेरगिरी केल्यावर काय शिक्षा मिळते? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
सीआरपीएफ जवानाला अटकराष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हेरगिरीच्या आरोपाखाली सीआरपीएफ जवान मोती राम जाटला अटक केली आहे. हा सैनिक सतत पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता आणि भारताची अनेक गुप्त माहिती त्यांना देण्याचे काम करत होता. त्या बदल्यात त्याला पैसेही मिळायचे. सध्या त्या सैनिकाची चौकशी सुरू आहे.
सुरक्षा दलांचे हेर कसे पकडले जातात?अशा हेरगिरीला पकडण्यासाठी सैन्य आणि सुरक्षा दलांमध्ये स्वतंत्र सायबर सेल तयार केले जातात. या सेलमधील लोकांचे काम सैन्यात काम करणाऱ्या सैनिकांवर आणि अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवणे आहे. जर एखाद्याने सोशल मीडियावर काही पोस्ट केले असेल किंवा फोनवर काही संशयास्पद हालचाल दिसली, तर त्या व्यक्तीचा माग काढण्यास सुरुवात केली जाते. गरज पडल्यास, फोन देखील ट्रेस केले जातात आणि पुरावे आढळल्यास अटक केली जाते.
शिक्षा काय आहे?सैन्य किंवा निमलष्करी दलातील अशा हेरगिरी करणाऱ्या सैनिकांना किंवा अधिकाऱ्यांना प्रथम सैन्य पोलिसांकडून अटक केली जाते आणि तपास यंत्रणेकडे सोपवले जाते. सहसा अशा प्रकरणांची चौकशी एनआयएकडून केली जाते. अशा सैनिकांना तात्काळ निलंबित केले जाते आणि त्यांना पुढील कोणत्याही सुविधा किंवा पेन्शन मिळत नाही. अशी सर्व प्रकरणे 1923च्या अधिकृत गुप्त कायदा अंतर्गत येतात. लष्कराच्या बाबतीत, या अंतर्गत खटला दाखल करण्यापूर्वी लष्कराकडून एनओसी घेतली जाते.
हेरगिरीच्या अशा प्रकरणांमध्ये, BNS चे कलम 152, 147 आणि 148 देखील लागू केले जातात. देशाशी विश्वासघात करणाऱ्यांना या कलमांखाली शिक्षा दिली जाते. जर आरोप सिद्ध झाले तर अशा प्रकरणांमध्ये किमान तीन वर्षे किंवा जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते.