शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

"भारताचा मुकुट आता मोकळा श्वास घेतोय, जम्मू-काश्मीरने विकासाची उंची गाठली"; मोदींच्या स्वागतासाठी मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 09:24 IST

मोदी म्हणाले, श्रीनगरच्या अद्भुत लोकांमध्ये आल्याचा आनंद आहे. विकसित जम्मू काश्मीर हे भारतासाठी आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीर हा देशाचा मुकुट असल्याचे वर्णन करून पंतप्रधान म्हणाले की, विकसित जम्मू आणि काश्मीर बनवण्याचा मार्ग पर्यटनाच्या शक्यता आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणातून निघेल.

सुरेश एस डुग्गर

जम्मू/श्रीनगर : कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरने विकासाची नवी उंची गाठत येथील नागरिक आता मोकळा श्वास घेत आहेत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील जाहीर सभेत सांगितले. काँग्रेसने कलम ३७० वरून जम्मू-काश्मीरच्या लोकांचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. श्रीनगर येथे झालेल्या सभेत त्यांनी ६४०० कोटींहून अधिक विकासकामांचे लोकार्पण केले, तसेच एक हजार युवकांना नियुक्तीपत्रही देण्यात आले.

मोदी म्हणाले, श्रीनगरच्या अद्भुत लोकांमध्ये आल्याचा आनंद आहे. विकसित जम्मू काश्मीर हे भारतासाठी आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीर हा देशाचा मुकुट असल्याचे वर्णन करून पंतप्रधान म्हणाले की, विकसित जम्मू आणि काश्मीर बनवण्याचा मार्ग पर्यटनाच्या शक्यता आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणातून निघेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी नाझीम नावाच्या मध विक्रेत्याने मोदींसोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. मोदींनीही त्या तरुणाची इच्छा पूर्ण केली आणि सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली. याचा फोटो शेअर करताना पंतप्रधान म्हणाले की, माझा मित्र नाझीमसोबतचा एक कायम आठवणीत राहणारा सेल्फी. त्याच्या चांगल्या कामाने मी प्रभावित झालो. जाहीर सभेत त्याने सेल्फीची विनंती केली आणि त्याला भेटून मलाही आनंद झाला. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा, असे मोदींनी म्हटले.

शंकराचार्य पर्वताला केले नमनमोदी यांनी श्रीनगरला येताच सभेपूर्वी शंकराचार्य पर्वतावरील मंदिराला नमस्कार केले. त्यानंतर मोदींच्या स्वागतासाठी स्थानिक नागरिक प्रचंड उत्साह दिसला. अनेकांनी त्यांच्या स्वागतासाठी हाती फलक घेतले होते.

शहीद सैनिकांना श्रद्धांजली- विमानतळावर आगमन झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी बदामीबाग छावणी येथील युद्ध स्मारकावर शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. - त्यानंतर ‘विकसित भारत, विकसित जम्मू-काश्मीर’ कार्यक्रमात त्यांनी ६४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे अनावरण केले.

उपस्थितांची प्रचंड गर्दी; सर्वत्र कडेकोट बंदोबस्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जम्मू-काश्मीरमधील असंख्य लोक श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर उपस्थित होते. त्यांनी मोदींचे मुखवटे घातले होते आणि त्यांच्या नावाचा जयघोष करत होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त श्रीनगरसह खोऱ्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ड्रोन, सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले होते.................पदवी घेतल्यानंतर तरुणांना १ लाखकंपन्यांमध्ये प्रशिक्षण देणार : राहुल गांधी

जयपूर : केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास तरुणांना ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. प्रत्येक पदवी आणि पदविकाधारक तरुणांना सरकारी किंवा खासगी कंपनीत एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण (अप्रेंटिसशिप) दिले जाईल. त्यासाठी त्याला एका वर्षात १ लाख रुपये विद्यावेतन दिले जाईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बांसवाडा येथे केली.   बांसवाडा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस युवकांसाठी पाच ऐतिहासिक कामे करणार आहेत. ज्यात भरतीची हमी, पहिल्या नोकरीची हमी, पेपरफुटीपासून मुक्तता, ‘गिग इकॉनॉमी’त सामाजिक सुरक्षा आणि ‘युवा रोशनी’ यांचा समावेश राहील.  आम्ही देशातील सर्व तरुणांना शिकाऊ शिक्षणाचा अधिकार देणार आहोत. त्यासाठी वर्षभरात त्याला १ लाख रुपये विद्यावेतन दिले जाईल. हा मनरेगासारखा हक्क असेल. याचा फायदा कोट्यवधी तरुणांना होणार आहे. त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि एकप्रकारे त्यांना पहिल्या वर्षीच रोजगार मिळेल.

‘गिग वर्कर्स’साठी सुरक्षा कायदाओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन इत्यादी कंपन्यांसाठी चालक, सुरक्षारक्षक आणि प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या ‘गिग वर्कर्स’साठी सामाजिक सुरक्षा कायदा आणण्याची घोषणाही गांधींनी केली.राजस्थानमधील यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने असा कायदा केला होता. हाच कायदा आम्ही संपूर्ण देशात लागू करू, असेही ते म्हणाले. याशिवाय त्यांनी ‘युवा रोशनी’ योजनेची घोषणा केली. ज्याअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांना पाच हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी दिला जाईल. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही जाहीर सभेला संबोधित केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा