शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

"भारताचा मुकुट आता मोकळा श्वास घेतोय, जम्मू-काश्मीरने विकासाची उंची गाठली"; मोदींच्या स्वागतासाठी मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 09:24 IST

मोदी म्हणाले, श्रीनगरच्या अद्भुत लोकांमध्ये आल्याचा आनंद आहे. विकसित जम्मू काश्मीर हे भारतासाठी आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीर हा देशाचा मुकुट असल्याचे वर्णन करून पंतप्रधान म्हणाले की, विकसित जम्मू आणि काश्मीर बनवण्याचा मार्ग पर्यटनाच्या शक्यता आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणातून निघेल.

सुरेश एस डुग्गर

जम्मू/श्रीनगर : कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरने विकासाची नवी उंची गाठत येथील नागरिक आता मोकळा श्वास घेत आहेत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील जाहीर सभेत सांगितले. काँग्रेसने कलम ३७० वरून जम्मू-काश्मीरच्या लोकांचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. श्रीनगर येथे झालेल्या सभेत त्यांनी ६४०० कोटींहून अधिक विकासकामांचे लोकार्पण केले, तसेच एक हजार युवकांना नियुक्तीपत्रही देण्यात आले.

मोदी म्हणाले, श्रीनगरच्या अद्भुत लोकांमध्ये आल्याचा आनंद आहे. विकसित जम्मू काश्मीर हे भारतासाठी आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीर हा देशाचा मुकुट असल्याचे वर्णन करून पंतप्रधान म्हणाले की, विकसित जम्मू आणि काश्मीर बनवण्याचा मार्ग पर्यटनाच्या शक्यता आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणातून निघेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी नाझीम नावाच्या मध विक्रेत्याने मोदींसोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. मोदींनीही त्या तरुणाची इच्छा पूर्ण केली आणि सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली. याचा फोटो शेअर करताना पंतप्रधान म्हणाले की, माझा मित्र नाझीमसोबतचा एक कायम आठवणीत राहणारा सेल्फी. त्याच्या चांगल्या कामाने मी प्रभावित झालो. जाहीर सभेत त्याने सेल्फीची विनंती केली आणि त्याला भेटून मलाही आनंद झाला. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा, असे मोदींनी म्हटले.

शंकराचार्य पर्वताला केले नमनमोदी यांनी श्रीनगरला येताच सभेपूर्वी शंकराचार्य पर्वतावरील मंदिराला नमस्कार केले. त्यानंतर मोदींच्या स्वागतासाठी स्थानिक नागरिक प्रचंड उत्साह दिसला. अनेकांनी त्यांच्या स्वागतासाठी हाती फलक घेतले होते.

शहीद सैनिकांना श्रद्धांजली- विमानतळावर आगमन झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी बदामीबाग छावणी येथील युद्ध स्मारकावर शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. - त्यानंतर ‘विकसित भारत, विकसित जम्मू-काश्मीर’ कार्यक्रमात त्यांनी ६४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे अनावरण केले.

उपस्थितांची प्रचंड गर्दी; सर्वत्र कडेकोट बंदोबस्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जम्मू-काश्मीरमधील असंख्य लोक श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर उपस्थित होते. त्यांनी मोदींचे मुखवटे घातले होते आणि त्यांच्या नावाचा जयघोष करत होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त श्रीनगरसह खोऱ्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ड्रोन, सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले होते.................पदवी घेतल्यानंतर तरुणांना १ लाखकंपन्यांमध्ये प्रशिक्षण देणार : राहुल गांधी

जयपूर : केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास तरुणांना ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. प्रत्येक पदवी आणि पदविकाधारक तरुणांना सरकारी किंवा खासगी कंपनीत एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण (अप्रेंटिसशिप) दिले जाईल. त्यासाठी त्याला एका वर्षात १ लाख रुपये विद्यावेतन दिले जाईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बांसवाडा येथे केली.   बांसवाडा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस युवकांसाठी पाच ऐतिहासिक कामे करणार आहेत. ज्यात भरतीची हमी, पहिल्या नोकरीची हमी, पेपरफुटीपासून मुक्तता, ‘गिग इकॉनॉमी’त सामाजिक सुरक्षा आणि ‘युवा रोशनी’ यांचा समावेश राहील.  आम्ही देशातील सर्व तरुणांना शिकाऊ शिक्षणाचा अधिकार देणार आहोत. त्यासाठी वर्षभरात त्याला १ लाख रुपये विद्यावेतन दिले जाईल. हा मनरेगासारखा हक्क असेल. याचा फायदा कोट्यवधी तरुणांना होणार आहे. त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि एकप्रकारे त्यांना पहिल्या वर्षीच रोजगार मिळेल.

‘गिग वर्कर्स’साठी सुरक्षा कायदाओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन इत्यादी कंपन्यांसाठी चालक, सुरक्षारक्षक आणि प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या ‘गिग वर्कर्स’साठी सामाजिक सुरक्षा कायदा आणण्याची घोषणाही गांधींनी केली.राजस्थानमधील यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने असा कायदा केला होता. हाच कायदा आम्ही संपूर्ण देशात लागू करू, असेही ते म्हणाले. याशिवाय त्यांनी ‘युवा रोशनी’ योजनेची घोषणा केली. ज्याअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांना पाच हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी दिला जाईल. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही जाहीर सभेला संबोधित केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा