शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

येत्या निवडणुकांत शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक - योगेंद्र यादव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 5:10 AM

आगामी लोकसभा निवडणुकीत शेतक-यांमधील असंतोषाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी त्याची चुणूक दाखवून दिली आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शेतकºयांमधील असंतोषाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी त्याची चुणूक दाखवून दिली आहे. या निकालांच्या धसक्यानेच देशातील तब्बल १५ राज्यांना विविध शेतकी योजनांची घोषणा करावी लागल्याचा दावा, स्वराज इंडिया पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी केला.मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित वार्तालापात योगेंद्र यादव यांनी पाच राज्यांतील निवडणुकांचा अन्वयार्थ आणि त्याच्या परिणामावर भाष्य केले.येत्या निवडणुकीत भाजपाच्या जागा किमान शंभरने कमी होण्याची शक्यता आहे. सध्याचे वातावरण पाहता १५० ते २०० दरम्यान भाजपा राहील. काँग्रेस स्वत:ला सक्षम पर्याय म्हणून सिद्ध करते किंवा नाही यावर भाजपा १५० च्या आसपास राहणार की २०० च्या घरात जाणार हे ठरेल, असे यादव म्हणाले.मोदींचे पाच ‘एम’केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची भिस्त पाच ‘एम’वर टिकून आहे. यात पहिला एम म्हणजे स्वत: मोदी, त्यानंतर मंदिर, मशीन (भाजपाची निवडणूक यंत्रणा), मीडिया आणि मनी, असे यादव म्हणाले.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवNarendra Modiनरेंद्र मोदी