शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशातील रेल्वे अपघातानं क्रीडा विश्व 'गहिवरलं', मृत्यूचं तांडव पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 20:03 IST

Odisha Train Accident : ओडिशा येथील रेल्वे अपघातात अवघ्या जगासह क्रिकेट विश्वाच्या डोळ्यात पाणी आणलं

नवी दिल्ली : ओडिशात रेल्वेअपघाताची काल घडलेली घटना म्हणजे एक वाईट स्वप्नच. कालच्या दुर्दैवी घटनेनं कुणाच्या पोटचा लेक गेला, कोण अनाथ झालं तर कुणाचा आधार गेला. ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली, त्यानंतर हावडा एक्सप्रेसनेही जोरदार धडक दिली. या ३ ट्रेनच्या अपघाताचे भयावह फोटो आता समोर येत आहेत. सर्वच स्तरातून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे शिलेदार यांनी देखील या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

 त्यामुळे मृतदेहांची काय अवस्था झाली असेल याचा अंदाजही लावणे कठीण आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. अशातच पश्चिम बंगालमधील मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. पाहता पाहता मृतांचा आकडा आता २०७ वरून २८८ वर पोहचला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ट्विटच्या माध्यमातून मृतांना श्रद्धांजली वाहिली. 

ओडिशात झालेल्या रेल्वे दुर्घटनेने मोठा धक्का बसला - लोकेश राहुल

जखमींनी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना - विराट कोहली

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने देखील या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.

मिताली राज भावुक

"बालासोर रेल्वे अपघातातील दृश्ये खरोखरच हृदय पिळवटून टाकणारी आहेत", असं भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजनं म्हटलं. 

ओडिशातून आलेली हृदयद्रावक बातमी - इरफान पठाण

भारतातील अत्यंत दुर्दैवी घटना - शोएब अख्तर, पाकिस्तानचा माजी खेळाडू

तरूणाईचा मदतीचा हात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत २८० हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातrailwayरेल्वेAccidentअपघातVirat Kohliविराट कोहलीSmriti Mandhanaस्मृती मानधनाRohit Sharmaरोहित शर्माTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ