शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

देशात २६३ लाख टन साखर उत्पादन होईल : प्रकाश नाईकनवरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 20:20 IST

केंद्र सरकारने दिली ६० लाख टन साखर निर्यातीची परवानगी

ठळक मुद्देनिर्यातीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनगेल्यावर्षीचा शिल्लकी साखरेचा १४४ लाख टनांहून अधिक साठाकच्च्या साखरेचा प्रतिक्विंटल दर १९०० आणि पांढऱ्या साखरेचा भाव २२०० रुपये

पुणे : गेल्या दोन हंगामातील उच्चांकी साखर उत्पादनानंतर यंदा देशातील साखर उत्पादन २६३ लाख टनापर्यंत खाली येईल. गेल्यावर्षीचा शिल्लकी साखरेचा १४४ लाख टनांहून अधिक साठा आहे. मार्चपर्यंत ब्राझिल आणि ऑस्ट्रेलियातील साखर बाजारात येणार नाही. या संधीचा फायदा घेत कारखान्यांनी निर्यात केली पाहिजे, असे आवाहन साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केले. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुरस्कार वितरण समारंभापुर्वी त्यांनी ही माहिती दिली. ‘गेल्यावर्षीच्या हंगामामधे देशात तब्बल ३३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकात अतिवृष्टीमुळे उसाची मोठी हानी झाली. त्यामुळे यंदा राज्यासह देशातील साखर उत्पादन २६३ लाख टनापर्यंत घसरेल असा अंदाज आहे. गेल्यावर्षीचे १४४.३ लाख टन साखर शिल्लक आहे. देशाचा वार्षिक खप हा २६० लाख टन इतका आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामधे कच्च्या साखरेचा प्रतिक्विंटल दर १९०० आणि पांढऱ्या साखरेचा भाव २२०० रुपये आहेत. ब्राझिल आणि इतर देशातील साखर मार्च नंतर बाजारात येईल. त्यामुळे ही संधी कारखान्यांनी सांधली पाहिजे, असे नाईकनवरे म्हणाले. केंद्र सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीची परवानगी दिली आहे. त्या पैकी २४ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. मात्र, त्यातील १५ ते १६ लाख टनांचे करार एकट्या उत्तरप्रदेशातील कारखान्यांनी केले आहेत. साखरेचे पोते हे बँकेकडे तारण असते. त्यापोटी बँक किंमतीच्या ८५ टक्के रक्कम कारखान्यांना देते. त्यामुळे निर्यातीस अडचण येत आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच कारखान्यांना ब्रिज लोन देण्याची गरज असल्याचे नाईकनवरे म्हणाले. ----------------------किमान विक्री दरात होणार बदल केंद्र सरकारने गेल्या हंगामामधे साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल इतका निश्चित केला आहे. मात्र, हा दर ठरविताना बँक खर्चाचा विचार केला गेला नाही. केंद्र सरकारने त्याचा आढावा घेण्याचे मान्य केले असून, किमान विक्री दर ३३०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत वाढतील, असे साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार